राज्य शासनाने दिलेल्या सुविधा, संधी आणि प्रशिक्षणामुळे मराठा-कुणबीतील गुणवत्तेला झळाळीः विनायक नरवाडे देशात 37 वा, चार मुलींचेही लख्ख यश
प्रतिनिधी / कोल्हापूर
छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था अर्थात सारथी'च्या माध्यमातून राज्य शासनाने दिलेल्या सुविधा, संधी आणि प्रशिक्षणाचा लाभ उठवत केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) परीक्षेत राज्यातील मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या गटातील तब्बल 21 गुणवान विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. युपीएससी परीक्षेचा अंतिम निकाल शुक्रवारी जाहीर झाला. अंतिम गुणवत्ता यादी घोषित करण्यात आली. 850 जणांच्या या गुणवत्ता यादीत
सारथी’च्या पाठबळावर परीक्षा दिलेल्या 21 विद्यार्थ्यांनी मिळवलेले स्थान लक्षवेधी ठरले आहे. विशेष म्हणजे विनायक नरवाडे गुणवत्ता यादीत संपूर्ण देशात 37 वा क्रमांकावर आहे.
पुण्यात मुख्यालय आणि कोल्हापूरमध्ये उपमुख्य केंद्र असणारी सारथी'r संस्था मराठा, कुणबी, कुणबी-मराठा, मराठा-कुणबी या गटाच्या सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी कार्यरत आहे. या गटातील उमेदवारांना स्पर्धा परीक्षांमध्ये यश मिळावे, त्यांना विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्याकरीता
सारथी’ प्रयत्नशील आहे. युपीएससी परीक्षेच्या तयारीसाठी सारथी'तर्फे पात्र विद्यार्थ्यांना विद्यावेतन देऊन दिल्ली व पुणे येथील नामांकित कोचिंग संस्थेत निःशुल्क प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करून देण्यात आली होती. परीक्षेनंतर झालेल्या मुलाखतीच्या तयारीकरिता विशेष प्रशिक्षणाचे आयोजन करून कोरोनाचा काळ असल्याने झूम मिटिंगद्वारे तज्ञांचे मार्गदर्शन देण्यात आले होते. त्याचबरोबर अभिरूप मुलाखतीचे नियोजन करून विद्यार्थ्यांना वैयक्तिकस्तरावरही मार्गदर्शन करण्यात आले होते. प्रत्यक्ष गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर
सारथी’चे तब्बल 21 विद्यार्थी यशस्वी झाल्याचे स्पष्ट झाले. सारथीच्या स्थापनेपासून युपीएससीच्या परीक्षेत पहिल्यांदा सर्वात मोठे यश मिळाले आहे. सोयी, सुविधा, मार्गदर्शन, मदत आणि संधी मिळाल्यास संधीचे सोने करता येते हे सारथीच्या 21 विद्यार्थ्यांनी दाखवून दिले आहे, अशी प्रतिक्रिया सारथी'चे अध्यक्ष निवृत्त आयएएस अजितसिंह निंबाळकर यांनी दिली. तर
सारथी’चे व्यवस्थापकीय संचालक आयएएस अशोक काकडे यांनी यशस्वी विद्यार्थ्यांनी प्रशासकीय उत्तम काम करून देशाच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन केले आहे.
सारथी' बचावच्या लढÎाला
तरुण भारत’चे बळ
भाजप-शिवसेना सरकारच्या काळात सारथी संस्थेची स्थापना तत्कालिन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्या पुढाकारामुळे झाली. पण त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात प्रारंभी सारथी' मोडण्याचे राजकारण झाले होते. त्यासंदर्भात खासदार संभाजीराजे यांच्यासह मराठा संघटनांनी आवाज उठविला.
सारथी’r बचावच्या लढÎाला तरुण भारत'नेही वेळोवेळी वृत्त प्रसिद्ध करून बळ दिले.
सारथी’च्या वाचल्याने आज युपीएससीच्या परीक्षेत विद्यार्थी मोठÎा प्रमाणावर गुणवत्ता यादीत आल्याची प्रतिक्रिया `सारथी’ची सर्वप्रथम संकल्पना मांडणाऱया मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी दिली.
युपीएससीच्या परीक्षेतील गुणवंत 21 विद्यार्थी असे ः (कंसात रँक)
विनायक कारभारी नरवाडे, (37), गौरव रविंद्र साळुंखे (182), प्रतिक अशोक धुमाळ (183), प्रथमेश अरविंद राजशिर्के (236) आनंद अशोक पाटील, (325) सागर भारत मिसाळ (352) सुरज भाऊसाहेब गुंजाळ, (353) अनिल रामदास मस्के, (361) अर्पिता अशोक ठुबे, (383) अमोल सुरेशराव मुरकुट, (402) अनिकेत अशोक फडतरे (426) राकेश महादेव अकोलकर (432) ओंकार मधुकर पवार, (455) नितीन गंगाधर पुके (466) प्रणव विनोद ठाकरे, (476) रणजीत मोहन यादव (513) माधुरी भानुदास गरुड (561) पूजा अशोक कदम, (577) हर्षल भगवान घोगरे , (614) रविराज हरिश्चंद्र वडक (633) आणि सायली अशोक गायकवाड (641).
सारथीमुळे मराठा समाजातील विद्यार्थ्यांना युपीएससी सारख्या परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनण्याचे स्वप्न पूर्ण होण्यात मोलाचा हातभार लागत आहे, निकालातून अधोरेखित होते. मराठा समाजासाठी आरक्षणा इतकीच सारथी संस्थाही महत्वाची आहे.- संभाजीराजे छत्रपती, खासदार