कणकवली/प्रतिनिधी:
महाराष्ट्र् निवनिर्माण सेनेचे जिल्हाध्यक्ष राजन शंकर दाभोलकर (५४) यांचे दीर्घ आजाराने निधन झाले.मुळ वेंगुर्ला तालुक्यातील दाभोळे गावचे रहिवासी असलेले दाभोलकर येथील तेलीआळी येथे स्थायिक झाले होते. महाराष्ट्र निवनिर्माण पक्षाच्या स्थापनेनंतर सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष पदाची सूत्रे त्यांनी सांभाळली होती. जिल्ह्यात मनसे पक्ष वाढीसाठी त्यांचे मोलाचे योगदान होते. सर्वच राजकीय पक्षातील नेत्यांसोबत त्याचे सलोख्याचे संबंध होते. जिल्ह्यातील विविध प्रश्नांबाबत ते मनसेच्या माध्यमातून आवाज उठवत. शहरातील सामजिक उपक्रमात ते अग्रेसर असत. सर्वसामान्याच्या न्याय हक्कासाठी वेळोवेळी रस्त्यावर उतरून प्रशासनाच्या कारभारा विरूद्धही त्यांनी अनेकदा आवाज उठविला होता. हसतमुख व मनमिळावू स्वभावामुळे त्यांचा मित्र परिवारही मोठा होता. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, भाऊ, काका असा परिवार आहे. राजन दाभोलकर यांच्यावर बुधवार 6 ऑक्टोबर रोजी दुपारी वेंगुर्ले येथील दाभोळे गावात अत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.
त्यांच्या दुःखद निधनाने मनसेने एक सच्चा क्रियाशील कार्यकर्ता गमावला. मनसेला त्यांची उणीव कायम भासेल, अशा शब्दात मनसे सरचिटणीस परशुराम उपरकर यांनी श्रद्धांजली व्यक्त केली आहे.