मंत्री विश्वजित राणे यांची घोषणा, पाल देऊळवाडा येथील अंगणवाडी इमारतीचे उद्घाटन
प्रतिनिधी /वाळपई
आज अंगणवाडी शाळांसाठी चांगल्या प्रकारच्या सुविधा निर्माण झालेली आहे. ग्रामीण भागातील अंगणवाडी हा शिक्षणाचा मूळ मंत्र आहे. त्यांना चांगल्या प्रकारचे शिक्षण देऊन चांगल्या प्रकारच्या सुविधा उपलब्ध करणे हे महिला व बालकल्याण खात्याचे प्रमुख उद्दिष्ट आहे. यामुळे येणाऱया नोव्हेंबर महिन्यामध्ये अंगणवाडी मुलांसाठी टॅब उपलब्ध करून देणार असल्याची घोषणा आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी केली आहे.
ठाणे पंचायत क्षेतातील पाल देऊळवाडा या ठिकाणी उभारण्यात आलेल्या अंगणवाडी इमारतीच्या उद्घाटन समारंभात ते बोलत होते. यावेळी नामफलकाचे अनावरण करून व फीत कापून याइमारतीचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर सातेरी देवस्थान सभामंडपात आयोजित करण्यात कार्यक्रमाच्या व्यासपीठावर महिला व बालकल्याण खात्याच्या संचालिका दीपाली नाईक ठाणे पंचायतीचे सरपंच निलेश परवार
जि.प.सभासद देवयानी गावस,सामाजिक कार्यकर्ते विनोद शिंदे पंच सभासद सूर्यकांत गावकर लता गावकर प्रजिता गावस उमेश सावंत व इतरांची उपस्थिती होती .
यावेळी बोलताना आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी सांगितले की आज ग्रामीण भागामध्ये मोठय़ा प्रमाणात महिलांची चळवळ निर्माण झालेली आहे. या चळवळीचा फायदा अंगणवाडी विद्यालयात मुलांची पटसंख्या वाढविण्याच्या दृष्टिकोनातून महत्त्वाचा ठरत आहे. शिक्षणाकडे भेदभाव करणे शक्मय नाही .कारण ज्यापद्धतीचे शिक्षण शहरी भागांमध्ये उपलब्ध आहेत अशा प्रकारचे शिक्षण ग्रामीण भागामध्ये उपलब्ध होणे ही प्रत्येकाचा हक्क आहे .यामुळे महिला व बालकल्याण खात्याच्या माध्यमातून अंगणवाडी मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण उपलब्ध करून देणे यासाठी वेगळय़ा स्तरावर प्रयत्न करण्यात येत आहे. याचाच भाग म्हणून येणाऱया काळात ई-लर्निंगच्या माध्यमातून या मुलांना दर्जात्मक शिक्षण उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार असल्याचे यावेळी ते म्हणाले. महिला व बाल कल्याण खात्याच्या स्वावलंबन योजनेचा महिला बचत गट व महिला मंडळांनी फायदा घ्यावा अशा प्रकारचे आवाहन करताना सत्तरी तालुक्मयात एक हजार पेक्षा जास्त महिला मंडळ व स्वयंसेवा गटाची निर्मिती करण्यासाठी महत्त्वाचे योगदान देणाऱया वाळपई बाल व महिला खात्याच्या प्रकल्प अधिकारी ललिता प्रभू पारकर यांच्या कार्याचे मंत्र्यांनी अभिनंदन केले.
जि.प.सभासद देवयानी गावस यांनी यांवेळी बोलताना अंगणवाडीच्या माध्यमातून मुलांच्या शिक्षणाला चांगल्या प्रकारचा फायदा होत असतो. लहान मुलांत चांगल्या प्रकारचे शिक्षण उपलब्ध होणे गरजेचे आहे .यासाठी अंगणवाडीमध्ये येणाऱया काळात दर्जात्मक शिक्षण उपलब्ध होणार असल्याबद्दल त्यांनी अभिनंदन केले.
खात्याच्या संचालिका दिपाली नाईक यांनी गोव्याच्या मुक्तीनंतरच्या पर्वात अंगणवाडी विद्यालयांना दर्जात्मक सुविधा उपलब्ध करून त्यामध्ये प्रयोगशील शिक्षण उपलब्ध करण्यासाठी पहिल्यांदाच प्रयत्न झालेला आहे. त्याचा येणाऱया काळात समाज विकासाच्या दृष्टिकोनातून फायदा होणार असून खात्याच्या अंगणवाडी शिक्षिकाना नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले
प्रारंभी व्यासपीठावरील उपस्थित मान्यवरांचे पुष्पगुच्छ प्रदान करून स्वागत करण्यात आले. तत्पूर्वी विद्यालय इमारतीचा उद्घाटन समारंभ करण्यात आला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उदय सावत यांनी केले तर शेवटी पंच सभासद उमेश सावंत यांनी आभार मानले.