प्रतिनिधी /बेळगाव
जिल्हय़ातील घाऊक बाजारपेठ म्हणून ओळख असणाऱया रविवारपेठ येथे रस्ता मोठा करण्यात आला. परंतु रहदारीची समस्या जैसेथेच आहे. एकाचवेळी तीन तीन वाहने रेटली जात असल्यामुळे मागे असणाऱया वाहनांना तासनतास ताटकळत रहावे लागते. यासोबत खरेदीसाठी जाणाऱया नागरिकांनाही या बेशिस्त वाहतुकीचा फटका बसत आहे.
रविवारपेठ येथे बेळगाव, बैलहोंगल, निपाणी, रामदुर्ग, गोवा, कोकण येथून होलसेल खरेदीसाठी खरेदीदार येतात. दररोज मोठय़ा प्रमाणात मालाची वाहतूक होते. यापूर्वी रविवार पेठेतील रस्ते लहान असल्यामुळे वाहतूक कोंडीची समस्या जाणवत होती. त्यामुळे काही वर्षांपूर्वी येथील सर्व रस्ते मोठे करण्यात आले. यामुळे दोन्ही बाजुंनी वाहने लावून मधून येण्या जाण्यास व वाहने बाहेर काढण्यास जागा ठेवण्याची सूचना करण्यात आली होती.
परंतु एकाचवेळी तीन-तीन वाहने रविवार पेठ येथे रेटली जात आहेत. जोपर्यंत त्या वाहनामध्ये माल भरून पूर्ण होत नाही तोवर ते वाहन तेथेच थांबून राहते. यामुळे मागून येणारी वाहने तासनतास या कोंडीमध्ये अडकत आहेत. त्यातच काही जण बेशिस्तपणे वाहने लावत असल्यामुळे वाहनचालकांसोबतच येथील व्यापाऱयांनाही त्याचा फटका बसत आहे. त्यामुळे शिस्तबद्धरित्या वाहने लावावी, अशी मागणी व्यापाऱयांमधून होत आहे.