प्रतिनिधी/ रत्नागिरी
कोकणावर परमेश्वराची मोठय़ा प्रमाणावर कृपा झाली आह़े महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस कोकणात पडत़ो असे असतानाही उन्हाळ्य़ात येथे पाण्याचे दुर्भिक्ष्य पहावयास मिळत़े पाण्याचे योग्य नियोजन करण्यासाठी जलसाक्षर पिढी उभी करणे काळाची गरज आह़े यासाठी विद्यापीठांमध्ये पदवी अभ्यासक्रम सुरू करायला हवा, असे प्रतिपादन जलतज्ञ राजेंद्रसिंह राणा यांनी व्यक्त केल़े
जिल्हाधिकारी कार्यालय येथील अल्पबचत सभागृहात रविवारी एक दिवसीय जलपरिषद आयोजित करण्यात आली होत़ी रत्नागिरी जिल्हा जलसाक्षर कमिटी, हिरवळ एज्युकेशन ट्रस्ट, हिरवळ प्रतिष्ठान व जलसाक्षर अभियान यशदा पुणे याच्यावतीने या परिषदेचे आयोजन करण्यात आले होत़े यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी ब़ी एन पाटील, ज़ि प. मुख्याधिकारी इंदुराणी जाखड, नगराध्यक्ष प्रदीप साळवी, माजी आमदार बाळ माने, मल्हार पाटेकर आदी उपस्थित होत़े
यावेळी बोलताना राजेंद्रसिंह म्हणाले की, देशामध्ये महाराष्ट्रात सर्वात आधी जलसाक्षरतेचा कार्यक्रम हाती घेण्यात आला होत़ा सर्वाधिक धरणे ही महाराष्ट्रात आहेत़ असे असतानाही पाण्याचे योग्य नियाजन नसल्यामुळे पाण्याच्या भीषण टंचाईला समोर जावे लागत आह़े बदलत्या हवामानाबरोबर पिक पाण्यावरही परिणाम झाला आह़े त्यामुळे पावसाचे प्रमाण लक्षात घेवून पीकांची निवड करणे गरजेचे आहे. पाण्याचा वापर कशाप्रकारे करावा, यासाठी याचा अभ्यास करणे ही आज काळाची गरज बनली आह़े
मंत्री सामंतांची जलदूत नेमणुकीची मागणी
जलपरिषदेत बोलताना मंत्री उदय सामंत म्हणाले की, विद्यापीठात अभ्यासक्रम सुरू करण्यासंबंधी लवकरच निर्णय घेण्यात येणार आह़े या संबंधी आपण कुलगुरूंशी बोललो असून पुढील वर्षापासून हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा आपला प्रयत्न राहणार आह़े कोकणात जलसंधारण कामासाठी राज्याचे जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याशी आपले बोलणे झाले आह़े सुमारे दीड हजार कोटी रूपयांची कामे या जिह्यात प्रस्तावित आहेत़ त्यासंबंधीही लवकरच निधी उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करणार आह़े जिल्हय़ात येणारी पाणीटंचाई रोखण्यासाठी जलदुत नेमणूक करावी, अशी विनंती मंत्री सामंत यांनी जिल्हाधिकारी यांना केल़ी
उद्घाटन कार्यक्रमानंतर जिल्हा जलसंपदा विभागाचे सादरीकरण, महापुरासंदर्भात उपाययोजनांबाबत वैशाली नारकर, गाळमुक्त धरण, शिवार, पाणीपुरवठा आदींबाबत जलतज्ञ डॉ. उमेश मुंडल्ये, जलजीवन मिशनबाबत डॉ. इंदुराणी जाखड यांनी सादरीकरण केल़े त्यानंतर मृद, जलसंधारण विभागातर्फे कार्यकारी अभियंता द. यो. दामा, बंधाऱयांच्या जागेची निवड, नियोजन, ग्रामपंचायतीचे सांडपाणी निवारण यावर डॉ. सुरेंद्र ठाकुरदेसाई यांनी मार्गदर्शन कल़े तसेच जलसंवर्धनात मनरेगाची प्रमुख भूमिका यावर जिल्हा कृषी अधिकारी माहिती दिली. दुसऱया सत्रात जल व कृषी, सुधारित पीक रचना, शाळा, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी जलसाक्षरता, जिह्यातील जलसंवर्धनात नाम संस्थेचा सहभाग, काजळी नदी पुनरुज्जीवन, पूरपरिस्थितीची कारणे यावर तज्ञांनी आपले विचार यावेळी व्यक्त केल़े
चौकट
बाळ मानेंना सोबत घेवून भल्या-भल्यांना पाणी पाजणार
जलपरिषद कार्यक्रमात मंत्री उदय सामंत यांनी सांगितले की, जनतेच्या पाण्याच्या प्रश्नावर सत्ताधारी विरोधक एकत्र काम करतात, ही समाधानाची बाब आह़े कार्यक्रमाला माजी आमदार बाळ माने यांनी देखील उपस्थिती लावली आह़े इतर प्रमख पक्षाचे लोक हे आपले मित्रपक्ष आहेत़ आता बाळ माने यांना सोबत घेऊन भल्या-भल्यांना आपण पाणी पाजणार असल्याचे सामंत यांनी यावेळी सांगितल़े
जल व्यवस्थापनासाठी प्रेरणादायी कार्य करणाऱयांचा सन्मान
जिह्यात शाश्वत एकसूत्रीय जलनियोजन व जल व्यवस्थापनासाठी प्रेरणादायी कार्य करणाऱया व्यक्तींचा सन्मान जलपरिषदेत मंत्री उदय सामंत, जलपुरुष राजेंद्रसिंह, जलनायक व हिरवळ प्रतिष्ठानचे प्रमुख किशोर धारिया यांच्याहस्ते करण्यात आले. जिह्यात अनेक जलकार्य बंधारे, आदर्शवत पाणीसाठय़ाचे कार्य फिनोलेक्स कंपनीच्या माध्यमातून सुरू आहे. या कार्यासाठी प्रकाश छाब्रिया यांचा गौरव करण्यात आला. त्यांच्यावतीने फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे मॅनेजर तानाजी काकडे यांनी गौरव स्वीकारला.
लांजा कॉलेजचे प्राचार्य डॉ. अरविंद कुलकर्णी यांचा सन्मान करण्यात आला. त्यांनी जिह्यातील 16 समुद्रांच्या जैवविविधतेचा अभ्यास करुन पीएचडी पदवी मिळवली. कोकणातील देवराईंचा अभ्यास करून त्यातील वृक्ष, त्यांच्या प्रजाती व ही पारंपरिक जैवविविधता एकत्र आणून त्यावर पुस्तक लिहिणाऱया डॉ. उमेश मुंडले यांचा गौरव केला. कोकणात गाळाने कोंडलेल्या श्वासांच्या नद्यांना पुन्हा गाळमुक्तीसाठी अभियान राबवणाऱया नाम फाऊंडेशनचे मल्हार पाटेकर यांना गौरवण्यात आले. कोकणात असणारा प्रचंड पाणीसाठा व पडीक जमिनीवर आर्थिक उन्नतीसाठी सुगंधी वनस्पती लागवडीचे प्रकल्प उभे करणारे विनायक काशिद, राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांमार्फत नद्यांचा गाळ काढणे, वनराई बंधारे बांधणे, असे जल उपक्रम सातत्याने करणारे लांजा कॉलेजचे प्रा. राहुल मराठे यांना सन्मानित केले. पालघर, बदलापूर, साखरपा येथे नदी पुनरुज्जीवनाला मार्गदर्शन करणारे डॉ.अजित गोखले, जल व पर्यटन या विषयामध्ये असणाऱया सांडपाण्याच्या पुनर्वापरासाठी जनजागृती करण्याचे काम करणारे राजू भाटलेकर यांना गौरवले. तसेच संकेत साळके व विजय मोरे यांनी लोटे गावातील पहिला झऱयापासून वीजनिर्मितीचा यशस्वी प्रयोग केल्याबद्दल गौरवण्यात आले.