ऑनलाईन टीम / नवी दिल्ली
१०० कोटी डोस पुर्ण झाल्याने मोदी सरकारचे कौतुक होत आहे. मात्र काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी याच मुद्याचा धागा पकडत कोरोना संसर्गातील दुसऱ्या लाटेत देशाची झालेल्या हाणीला मोदी सरकार जबाबदार असल्याचं म्हटले आहे.
सोनिया गांधी यांनी एका हिंदी वृत्तपत्रासाठी दिलेल्या लेखात भाजपच्या कारभारावर बोट ठेवले आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत भाजप सरकारने केलेल्या गंभीर चुकांमुळे याचा संपुर्ण फटका संपुर्ण देशाला बसला आहे. तसेच कोरोना काळात देशाची झालेली जीवितहानीला केवळ मोदी सरकारच जबाबदार आहे. असं ही त्यांनी या लेखात स्पष्ट केलं आहे.
“हम कैसे भूल जाएंगे वो दौर” या लेखामध्ये गांधी यांनी भाजपवर टीकास्त्र सोडले असले तरी कोरोना काळात आरोग्य सेवा देणारे डॉक्टर, आरोग्य कर्मचाऱ्यांचे कौतुक केले आहे.दरम्यान, या लेखात सोनिया गांधींनी देशात १०० कोटी लसीकरण झाल्याबद्दल वैज्ञानिकांचं अभिनंदन केलं आहे. पण त्याचं श्रेय मोदी सरकारला देण्यास त्यांनी नकार दिला आहे. “जर आज आपण १०० कोटी लसीचे डोस देण्यात यशस्वी ठरलो आहोत, तर त्याचं श्रेय डॉक्टर, नर्स आणि लसीकरण करणाऱ्या कर्मचाऱ्यांचं आहे. लसीची व्यवस्था आणि वितरण करण्यात अयशस्वी ठरलेल्या सरकारमधील लोकांना त्याचं श्रेय जात नाही”, असं सोनिया गांधींनी नमूद केलं आहे.
सोनिया गांधी यांनी कोरोना संकटाचा सामना करण्यासाठी मोदी सरकारने अवलंबलेलं धोरण दु:खद आणि दुर्दैवी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे अनेक वेळा इशारा देऊन ही एखादं सरकार इतकं निष्क्रिय कसं राहू शकतं हे समजण्याच्या पलीकडचं आहे”, तसेच कोरोनाच्या भीषण काळात पंतप्रधान आणि गृहमंत्री गायब झाले होते. असे ही गांधींनी या लेखात म्हटलं आहे.