प्रतिनिधी / दक्षिण सोलापूर
सोलापूर जिल्ह्यातील नांदनी येथील हुबळी राष्ट्रीय महामार्ग ५२, विजयपुर, जुमनाळ गावानजिक झालेल्या अपघातात नांदणीचे माजी सरपंच चिदानंद सुरवसे यांच्यासह अन्य तिघांचा या अपघातात जागीच मृत्यू झाला आहे. हा अपघात विजयपूरजवळ झाला असुन यातील सर्व मृत दक्षिण सोलापुरातील आहेत. यामुळे सर्वत्र शोककळा पसरली आहे.
कर्नाटक बस आणि कारच्या झालेल्या धडकेत कारमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला. कारचा वेग आणि चालकाचा निष्काळजीपणा हे या अपघाताचे कारण ठरले. विजयपूर ग्रामीण पोलिस स्टेशनच्या अधिकाऱ्यांनी या अपघाताची पाहणी केली असुन यातील मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही. विजयपूरहून नरगुंद बस घरगुती कार्यक्रम उरकून परतत असताना हा अपघात झाला.
यामध्ये के ए 22 एफ 2198 ही बस नरगुंद जात होती. तर एम एच 13 सीएस 3330 ही कार वेगाने होती. कारची बसला जोराची धडक बसली. या अपघातात फॉर्च्युनरमधील चार जणांचा जागीच मृत्यू झाला असुन याचा अधिक तपास विजयपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस करीत आहेत.