प्रतिनिधी/ सातारा, म्हसवड
माणदेशी संस्कृतीचे जतन करणाऱया एका कर्तुत्ववान स्रीला सातारा भूषण पुरस्कार देऊन सन्मानित केले आहे. यामुळे चेतना सिन्हांचे काम किती मोठे आहे हे आपल्याला दिसून येते. दुष्काळी प्रदेशाला नव्याने ओळख करून देण्याची काम माणदेशीमुळे झाले, असे गौरवोद्गार मुंबई उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती सत्यरंजन धर्माधिकारी यांनी सातारा येथे बोलताना काढले.
रा. ना. गोडबोले सार्वजनिक ट्रस्ट सातारा यांच्या वतीने यावर्षीचा सातारा भूषण पुरस्कार माणदेशी महिलांच्या उन्नतीसाठी अविरत कार्य करणाऱया चेतना सिन्हा यांना प्रदान करण्यात आला, यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी जिल्हाधिकारी शेखर सिंह, खासदार श्रीनिवास पाटील, विजय सिन्हा उपस्थित होते. रामनामी शाल, सन्मान चिन्ह व रोख रक्कम या स्वरुपात सातारा भूषण पुरस्कार चेतना सिन्हा यांना प्रदान करण्यात आला.
रचनात्मक कार्याशिवाय संघर्ष थीटा आहे. हे जाणून यांनी महात्मा गांधी आचार्य विनोबा व जयप्रकाश नारायण यांच्या विचाराने केलेले काम अतुलनीय असे आहे. कोणतेही सत्तेचे पद नसताना महिला सबलीकरण सक्षमीकरण करण्याचे काम अतिशय महत्वाचे आहे, असे यावेळी बोलताना सत्यरंजन धर्माधिकारी यांनी सांगितले.
महिलांना आर्थिक अधिकार नसताना त्यांच्यात आर्थिक साक्षरतेचे काम करणारी देशातील पहिली महिला बँक म्हणजे माणदेशी बँक व ती स्थापन करणाऱया चेतना सिन्हा यांचे काम अतिशय मोलाचे आहे. सातारकराच्या दृष्टीने ते गौरवास्पद आहे असे विचार जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी व्यक्त केले. खासदार श्रीनिवास पाटील यांनी माणदेशी संस्कृतीचा आढावा घेताना साहित्य-संस्कृती यांचे योगदान माणदेशांमध्येच नव्हे तर महाराष्ट्राच्या मातीत आहे. एका कर्तुत्ववान स्त्राrच्या मागे तिचा पती अतिशय समन्वयाने काम करत असल्याचे सांगितले.
यावेळी सन्मान चिन्ह करणारे डॉ. रवींद्र भारती व निवड समितीचे सदस्य सुजित शेख यांचा सत्कार करण्यात आला. रा. ना गोडबोले ट्रस्टचे मुख्य विश्वस्त अरुण गोडबोले यांनी सातारा भूषण पुरस्कार देण्यामागची भूमिका विशद केली आणि मानपत्राचे वाचन केले. डॉ. अच्यूत गोडबोले यांनी प्रास्ताविक केले. प्रद्युम्न गोडबोले यांनी सूत्रसंचालन केले तर उदयन गोडबोले यांनी आभार मानले. कार्यक्रमास सातारकर नागरिक, माणदेशी महिला, बचत गटाच्या महिला मोठय़ा संख्येने उपस्थित होते.
चौकट चेतना सिन्हा यांनी यापूर्वी हा पुरस्कार शेतकऱयांचे नेते शरद जोशी यांना मिळाला आणि त्यानंतर हा पुरस्कार मला मिळत होईल हा माझा सन्मान मी सर्व शेतकऱयांना समर्पित करते. माझे पती विजय सिन्हा व माझा हा एकत्रित पहिलाच सत्कार आहे. माझ्या कामाला सातारकरांनी भरपूर साथ दिलेली आहे हा माझा सत्कार नसून लाखो महिलांच्या सत्कार आहे माणदेशाचा सत्कार आहे असे त्या म्हणाल्या.