अकराव्या रणमाले महोत्सवाचे गुळ्ळ? सत्तरी येथे थाटात उद्घाटन : अनेक रणमाले पथकांचे दर्जेदार सादरीकरण.,सांस्कृतिक पुरस्कार प्राप्त झिलू गावकर याचा सन्मान.
प्रतिनिधी /वाळपई
ज्यावेळी मनोरंजनाची साधने नव्हती त्यावेळी रणमाले हा एकच मनोरंजनाचा महत्त्वाचा पर्याय ग्रामीण भागातील जनतेसमोर शिल्लक होता. आज परिस्थिती पूर्णपणे बदललेली आहे. आज मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध झालेली आहे .सुरवातीला रेडओ व नंतर दूरचित्रवाणी व आता मोबाईल यामुळे मनोरंजनाची अनेक साधने उपलब्ध झालेली आहेत. रणमाले कलेच्या माध्यमातून ग्रामीण पारंपारिक संस्कृतीची श्रीमंती आपल्या हदयामधे भरली आहे. मनोरंजनाची साधने उपलब्ध झाल्यामुळे रणमाल्याची पारंपरिक कला आज दुर्लक्ष होऊ लागलेली आहे. मात्र ग्रामीण कला व सांस्कृतिक संस्था यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येत असलेल्या महोत्सवाच्या माध्यमातून या पारंपरिक कलेला एक वेगळय़ा प्रकारची गती प्राप्त झालेली आहे. येणाऱया काळात लोकोत्सवामध्ये रणमाल्याच्या कलेचा अंतर्भाव करण्याच्या दृष्टिकोनातून निश्चितच प्रयत्न करण्यात येतील असे प्रतिपादन गोवा कला व संस्कृती खात्याचे उपसंचालक अशोक परब यांनी स्पष्ट केले आहे
.ग्रामीण कला व सांस्कृतिक संस्था वाळपई सत्तरी ,गोवा सरकार कला व संस्कृती खाते पणजी व रणमाले महोत्सव आयोजन समिती गुळ्ळ? यांच्या संयुक्त विद्यमाने गुळ्ळ? या ठिकाणी आयोजित करण्यात आलेल्या अकराव्या स्व.रामा धुरी स्मरणार्थ रणमाले महोत्सवात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान आमदार प्रतापसिंह राणे सामाजिक कार्यकर्त्या विजयादेवी राणे आयोजन समितीचे अध्यक्ष रामा राऊत ग्रामीण कला व सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष अंकुश धुरी सचिव प्रकाश गावकर देवस्थान समितीचे अध्यक्ष कृष्णा राऊत महोत्सवाचे उद्घाटक ज्ये÷ कलाकार येसो रावणकर व इतरांची खास उपस्थिती होती.
सत्तरी तालुक्मयात या वेगवेगळय़ा गावांमध्ये रणमाले तरुण पथक तयार होऊ लागलेले आहेत .ही खरोखरच कौतुकाची बाब आहे .गेल्या दहा वर्षापासून आयोजित करण्यात येत असलेल्या महोत्सवाचे हे खरे फलित असल्याचे यावेळी ते म्हणाले . रणमाले हे उत्कृष्ट समाज प्रबोधनाचे माध्यम आहे. समाजामध्ये होणाऱया अनेक चांगल्या वाईट गोष्टी रणमाले व्यासपीठावर मांडून त्यासंदर्भात जनजागृती करण्याची प्रक्रिया खरोखर कौतुकास्पद असल्याचे यावेळी ते म्हणाले.
या माध्यमातून समाजामध्ये जागृती निर्माण होणार असल्याचे अशोक परब यांनी यावेळी स्पष्ट केले.
गोवा राज्याचे माजी मुख्यमंत्री तथा विद्यमान आमदार प्रतापसिंह राणे यांनी यावेळी बोलताना सरकारने कलाकारांना ग्रामीण कलाकार मंच स्थापन करून संधी देण्यासाठी प्रयत्न करावेत अशी मागणी यावेळी त्यांनी केली. सरकारने याबाबत गांभीर्याने लक्ष द्यावे असे यावेळी ते म्हणाले .गोवा ही कलाकारांची खाण आहे. गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या गळय़ातून गोवा गात आहे. यामुळे गोव्याला वेगवेगळय़ा प्रकारची प्रति÷ा प्राप्त झालेली आहे .आपल्या भागामध्ये असलेले कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून दिल्यास ते चांगल्या प्रकारे आपली प्रतिमा निर्माण करू शकतात .रणमाले ही खरोखरच आपली संस्कृती आहे. या संस्कृतीचे संवर्धन व जतन होणे काळाची गरज असल्याचे यावेळी ते म्हणाले.
स्वातंत्र्यपूर्व काळात सुद्धा आपली पारंपरिक संस्कृती जतन झाली. मात्र अजूनही त्या काळामध्ये आज आपल्या संस्कृती समोर एक वेगळय़ा प्रकारचे संकट निर्माण झाले आहे. या संकटाचा सामना करायचा असेल तर आपली ग्रामीण भागातील पारंपरिक संस्कृती जतन करण्याची प्रक्रिया पुढे गेले पाहिजे .यासाठी तरुणांनी महत्त्वाचे योगदान द्यावे असे स्पष्ट केले व या महोत्सवाच्या आयोजनाबद्दल आयोजकांचे कौतुक केले.
सुरुवातीला पारंपारिक समई प्रज्वलित करून या महोत्सवाचे थाटात उद्घाटन करण्यात आले. यासाठी पारंपारिक पद्धतीने तयार केलेल्या समईच्या वापर करण्यात आला होता. स्वागत व प्रास्ताविक करताना संस्थेचे अध्यक्ष अंकुश धुरी यांनी गेल्या दहा वर्षापासून महोत्सवाचे आयोजन करण्यामगचा हेतू स्पष्ट केला. या महोत्सवाच्या माध्यमातून आपण अनेक कलाकार तयार केलेले आहेत. यामुळे येणाऱया काळात सुद्धा कलाकार तयार करण्याची प्रक्रिया सुरूच राहणार असून यासाठी समाजातील प्रत्येक घटकाने या संस्थेला पाठबळ द्यावे असे आवाहन यावेळी त्यांनी केले. त्याचप्रमाणे या संस्थेच्या प्रवाहामध्ये अनेकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल त्यांचे सर्वांचे धन्यवाद व्यक्त केले.
गोवा सरकारच्या कला व संस्कृती खात्याचा यंदाचा लोकवेद यासाठी प्राप्त झालेला सांस्कृतिक पुरस्कार झिलू गावकर यांचा यावेळी प्रतापसिंह राणे विजयादेवी राणे व इतर मान्यवरांच्या हस्ते सन्मान करण्यात आला .यावेळी त्यांना मानपत्र व भेटवस्तू प्रदान करण्यात आली.
यावेळी बोलताना झिलू गावकर यांनी सांगितले की आपल्याला प्राप्त झालेला हा सत्कार आपला नसून आपल्यावर संस्कार करणारी आपली आई कुटुंब व समाजातील प्रत्येक घटकाचा या मध्ये प्रामुख्याने अंतर्भाव आहे. यामुळे हा पुरस्कार आपण त्यांना समर्पित करतो असे स्पष्ट केले व येणाऱया काळातही पारंपरिक स्तरावर संशोधनाची प्रक्रिया सुरूच राहणार असल्याचे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले. यावेळी पारंपारिक संस्कृती जतानासाठी महत्वाचे योगदान देणाऱया कलाकारांच्या मान्यवरांच्या हस्ते खास सन्मान करण्यात आला
यात आत्मा नारायण गावस. गोकळे कृष्णा गावस. रुपावती गावस. झिलू गावकर. यांचा खास करून समावेश आहे. सुरुवातीला यांनी व्यासपीठावर उपस्थित मान्यवरांचे प्राजक्ता राऊत, सुषमा राऊत. तृप्ती गावस. रिचा उसपकर, स्नेहा रावणकर, यांनी स्वागत केले. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रशांत नाईक यांनी केले तर शेवटी रामा राऊत यांनी गायनाच्या माध्यमातून सर्वांचे उस्फुर्त असे आभार मानले. त्यानंतर सालेली येथील सिद्धेश्वर रणमाले पथकाचे दर्जेदार प्रमाणे सादर करण्यात आला. यावेळी मोठय़ा प्रमाणात प्रेक्षकांची उपस्थिती होती.