आर्थिक वर्ष 2020-21 साठीची आकडेवारी सादर
नवी दिल्ली : प्राप्तिकर विभागाने दिलेल्या माहितीनुसार आर्थिक वर्ष 2020-21 साठी आतापर्यंत पाच कोटीपेक्षा अधिकचे आयटीआर सादर करण्यात आले आहेत. यामध्ये वैयक्तिक करदात्यांना आर्थिक वर्ष 2020-21 मध्ये प्राप्तिकर परतावा सादर करण्याची अंतिम तारीख 31 डिसेंबर 2021 केली आहे.
प्राप्तिकर विभागाने आपल्या ट्वीटमध्ये म्हटल्याप्रमाणे सायंकाळी पाच वाजून 45 मिनिटापर्यंत पाच कोटीपेक्षा अधिकचा परतावा सादर करण्यात आला आहे. यामध्ये वेगाने वाढ होत असल्याचीही माहिती आहे. आर्थिक वर्ष 2019-20 करीता 5.95 कोटी आयटीआर सादर केले होते, ज्याच्यासाठी 10 जानेवारी 2021 पर्यंत कालावधी वाढविण्यात आला होता.