प्रतिनिधी/ बेळगाव
रेल्वेची गती वाढविण्याबरोबरच प्रवासाचा कालावधी कमी करण्यासाठी नैर्त्रुत्य रेल्वेने केएसआर बेंगळूर-मिरज (चन्नम्मा एक्स्प्रेस) या रेल्वेच्या वेळापत्रकात बदल केला आहे. तसेच रेल्वेस्थानकावरील थांबण्याचा कालावधी कमी केला आहे. 8 मेपासून नवीन वेळापत्रकानुसार रेल्वे धावणार आहे.
रात्री 11 वाजता बेंगळूर येथून रेल्वे निघून सकाळी 6 वाजता हुबळी येथे पोहोचणार आहे. 7.19 वा. अळणावर, 8 वा. लोंढा, 8.24 वा. खानापूर, 8.59 वा. बेळगाव, 9.33 वा. पाच्छापूर, 9.52 गोकाक रोड, 10.3 वा. घटप्रभा, 10.21 वा. चिकोडी रोड, 10.36 वा. रायबाग, 10.48 वा. चिंचली, 10.59 वा. कुडची, 11.10 वा. उगार खुर्द व दुपारी 12.10 वाजता मिरज येथे पोहोचणार आहे.
बेळगाव रेल्वेस्थानकावर केवळ एक मिनिटाचा थांबा
चन्नम्मा एक्स्प्रेस रेल्वेमध्ये बेळगावच्या प्रवाशांची संख्या अधिक असते. यापूर्वी बेळगाव रेल्वेस्थानकावर 5 मिनिटांचा थांबा देण्यात आला होता. परंतु आता केवळ 1 मिनीट रेल्वे थांबणार असल्याने प्रवाशांची गैरसोय होणार आहे. त्यामुळे या कालावधीत वाढ करण्याची मागणी बेळगावच्या प्रवाशांमधून केली जात आहे.