कर्मचाऱयांना कामावर येण्याची करताहेत विनंती
प्रतिनिधी/ रत्नागिरी
विलिनीकरणाच्या मुद्यावर संपावर असलेल्या एसटी कर्मचाऱयांना कामावर परत येण्यासाठी एसटीच्या अधिकाऱयांकडून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. महामंडळाकडून मिळालेल्या सूचनेनुसार आता एसटीचे अधिकारी कर्मचाऱयांच्या घरी जावून कामावर येण्यासाठी विनवणी करताना दिसत आहेत, मात्र संपावर असलेले कर्मचारी विलिनीकरणाच्या मागणीवर ठाम असल्याचेच दिसून येत आह़े या कर्मचाऱयांकडून त्यांना सेवेत येण्यास नकार देण्यात येत आहे.
एसटीचे शासनामध्ये विलिनीकरण झाल्याशिवाय आता संपामधून माघार नाही, अशी रोखठोक भूमिका संपावर बसलेल्या एसटी कर्मचाऱयांकडून घेण्यात आली आह़े मागील 2 महिन्यापासून संपावर असलेल्या कर्मचाऱयांचे निलंबन व बडतर्फीची कारवाई शासनाकडून करण्यात आल़ी यापुढे कितीही कारवाई केली तरी आता माघार घेणार नाही, अशी भूमिका एसटीच्या कर्मचाऱयांकडून घेतली जात आह़े देवरूख येथील एसटीच्या अधिकाऱयावर कर्मचाऱयाच्या घरी जावून अपशब्द बोलल्याचा आरोप एसटी कर्मचाऱयाकडून करण्यात आला होत़ा त्यामुळे एसटी कर्मचाऱयांच्या घरी जाण्याबाबतही अधिकारी उत्साही नसल्याचे दिसत आह़े
जिह्यामध्ये शुक्रवारीही एसटीच्या 400 हून अधिक फेऱया सोडण्यात रत्नागिरी विभागाला यश आल़े तर 750 कर्मचारी हजर झाले आहेत़ यामध्ये 87 अधिकृत रजेवर असणाऱया कर्मचाऱयांचाही समावेश आह़े हजर झालेल्या कर्मचाऱयांमध्ये 273 प्रशासकीय, 202 कार्यशाळा, 77 चालक, 68 वाहक, 43 चालक तथा वाहक आदींचा समावेश आह़े कर्मचाऱयांच्या संख्येत वाढ होत असल्याने लांब पल्ल्याच्या गाडय़ा वाढवण्याचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे एसटीकडून सांगण्यात आले.
एसटीच्या दरदिवशी चालणाऱया फेऱयांना प्रवाशांचा चांगला प्रतिसाद लाभत आह़े शुक्रवारी एकूण 26 हजाराहून अधिक प्रवाशांनी एसटीमधून प्रवास केल्याची आकडेवारी समोर आली आह़े यातून एसटीला सुमारे 5 लक्ष रूपयांचे उत्पन्न प्राप्त झाले आह़े पुढील काही दिवसांत आणखी कर्मचारी हजर होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आह़े