30 किमी अंतरावरील गावात घर
पूर्वजन्मीचा भाऊ भेटल्यावर रडू लागली
राजस्थानच्या राजसमंदमध्ये एका 4 वर्षीय मुलीने स्वतःच्या पुनर्जन्मासंबंधी केलेले दावे अत्यंत चकित करणारे आहेत. मुलीने केलेल्या दाव्यांमुळे आईवडिलांपासून नातेवाईक आणि ग्रामस्थही अवाप् झाले आहेत. चिमुरडी मागील जन्मातील किस्से सांगत असून त्याची पडताळणी केली असता ते खरे ठरत आहेत. पूर्वीच्या जन्मात मृत्यू कधी आणि कसा झाला हे 4 वर्षांची मुलगी सांगते.
परावल गावातील रतनसिंह चूंडावत यांना 5 मुली आहेत. मागील एक वर्षापासून त्यांची सर्वात लहान मुलगी किंजग (4 वर्षे) वारंवार स्वतःच्या भावला भेटायचे असल्याचे सांगत होती. प्रथम त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले, परंतु दोन महिन्यांपूर्वी तिची आई दुर्गा यांनी किंजलला वडिलांना बोलावण्यास सांगितले, तेव्हा माझे वडिल पिपलांत्री गावात राहतात असे तिने म्हटले. पिपलांत्री गावात ऊषा नावाच्या महिलेचा जळून मृत्यू झाला होता. हे गाव किंजलच्या गावापासून सुमारे 30 किलोमीटर अंतरावर आहे. आपण ऊषा असल्याचे किंजल सांगते.
9 वर्षांपूर्वी मृत्यू
मुलीचे उत्तर आणि दाव्यामुळे पूर्ण कुटुंब हादरले. 9 वर्षांपूर्वी जळून मृत्यू झाला होता असे किंजलने सांगितल्यावर वडिलांनी तिला डॉक्टरांकडे नेले, परंतु त्यांना कुठलीच समस्या आढळून आली नाही. परंतु किंजल आता पूर्वजन्मातील कुटुंबाला भेटण्याचा हट्ट करू लागली. माझ्या कुटुंबात भाऊबहिण असून वडिल ट्रक्टर चालवितात असे तिचे म्हणणे होते.
ऊषाच्या भावाची भेट
किंजलची कहाणी पिपलांत्रीमधील ऊषाचा भाऊ पंकजला समजली. पंकजला भेटताच किंजलला मोठा आनंद झाला. मोबाईलमध्ये आई आणि ऊषाचे छायाचित्र पाहताच ती रडू लागली. त्यानंतर पिपलांत्री गावात पोहोचलेल्या किंजलने अनेक महिलांशी जुनी ओळख असल्याप्रमाणे संवाद साधला. या रहस्यमय घटनेची उकल करणे सद्यस्थितीत अवघड असले तरीही याची वैज्ञानिक दृष्टीकोनातून पडताळणी होणे गरजेचे असल्याचे मत व्यक्त होतेय.