महिन्याभरात ११ गुन्हे दाखल
कुर्डुवाडी / प्रतिनिधी
रेल्वेचा प्रवास म्हणजे आरामदायी आणि सुरक्षित प्रवास असा समजला जातो. पण गेल्या काही दिवसांत रेल्वेतील चोऱ्यांचे प्रमाण वाढले आहेत महिन्याभरात कुर्डुवाडी लोहमार्ग पोलिस ठाण्यात चोरीचे ११ गुन्हे दाखल झाले असून १३ लाख २७ हजार ४५० रूपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. दुर्दैव असे की यापैकी एकाही चोरीचा छडा लावण्यात लोहमार्ग पोलिसांना यश आलेले नाही. याला रेल्वे प्रशासनाचा निष्काळजीपणा कारणीभूत असल्याचा आरोप प्रवसीवर्गातून होत आहे. अशा घटनामुळे प्रवाश्यांमध्ये भीतीचे वातावरण असून प्रशासनाने रेल्वेमध्ये आणि स्थानकावर सुरक्षा वाढवण्याची गरज आहे.