अव्दैत, साक्षी, जान्हवी गुरुवारी मायदेशी दाखल होण्याची शक्यता
प्रतिनिधी/ रत्नागिरी
शहरामधील मिरकरवाडा येथील मुस्कान सोलकर बुधवारी भारतामध्ये परतली असून ती सध्या दिल्लीतील महाराष्ट्र सदनामध्ये सुखरुप आहे. येत्या एक-दोन दिवसामध्ये ती रत्नागिरीमध्ये दाखल होणार असल्याची माहिती तिचे वडील मन्सूर सोलकर यांनी दिल़ी मुस्कान सुखरुपणे मायदेशी परतल्यामुळे रत्नागिरीवासियांसह तिच्या आई-वडिलांचा जीव भांडय़ात पडला आह़े
मुस्कान मंगळवारी रात्री रोमानिया येथून रात्रीच्या विमानाने दिल्ली येथे दाखल झाली. सोमवारी मुस्कान ही रोमानिया एअर पोर्टवर दाखल झाली होत़ी मात्र मायदेशी परतण्यासाठी कोणत्या विमानाने परतणार होती, याबद्दल अनिश्चितता होत़ी मात्र मंगळवारी रात्री 11 च्या सुमारास तिच्या विमानाने भारताच्या दिशेने उड्डाण केले आह़े मुस्कानचे वडील आज मुंबईत मुस्कानला आणण्यासाठी येथून रवाना होणार आहेत़
केवळ तीन सफरचंद व तीन बदामावर प्रवास
देवरुखमधील अव्दैत कदम, साक्षी नरोटे आणि जान्हवी शिंदे हे तिघे विद्यार्थी युक्रेनबाहेर हंगेरीमार्गे भारतामध्ये परतणार असल्याची माहिती साक्षीचे वडील प्रकाश नरोटे यांनी दिल़ी सध्या या तिन्ही विद्यार्थ्यांचा हंगेरीच्या सीमेपर्यंत रेल्वेने सुमारे 800 किमीचा प्रवास करत असून हा पूर्ण प्रवास ते उभ्याने आणि केवळ तीन सफरचंद व तीन बदामावर करत आहेत़
अव्दैत कदम, साक्षी नरोटे आणि जान्हवी शिंदे व अन्य भारतीय विद्यार्थ्यांसाठी युक्रेनच्या सरकारने सीमेपर्यंतच्या प्रवासासाठी रेल्वेची व्यवस्था केली आह़े ही रेल्वे मंगळवारी भारतीय वेळेनुसार सकाळी 8.30 वाजता खारकिव्हमधून सुटली आह़े या रेल्वेने सायंकाळी 7 वाजता युक्रेनची राजधानी किव्ह सोडले आह़े मात्र किव्ह सोडेपर्यंत पालक चिंतातूर झाले होते. कारण रशियन सैन्यामुळे किव्ह हे धोकादायक शहर बनले आह़े मात्र किव्ह पार केल्यानंतर पालकांची चिंता दूर झाल़ी बुधवारी सायंकाळपर्यंत हे विद्यार्थी हंगेरीमध्ये दाखल होणार आहेत़ हंगेरीमधील बुडापेस्ट विमानतळावरुन ते भारतामध्ये येणार आहेत़ यामुळे बुधवारी विमानाची सोय झाल्यास हे विद्यार्थी गुरुवारी भारतामध्ये दाखल होण्याची शक्यता आह़े दिल्लीमध्ये दाखल झाल्यानंतर या विद्यार्थ्यांना प्राधान्याने घरी परतण्यासाठी दिल्लीवरुन विमानाची अथवा अन्य मार्गाचा विचार सरकारने करावा, अशी मागणी त्यांच्या पालकांनी केली आह़े