ऑनलाईन टीम/तरुण भारत
पश्चिम बंगालमध्ये सोमवारी, तृणमूल काँग्रेसच्या पंचायत नेत्याच्या हत्येनंतर बारा घरांना आग लावली. या हिंसाचारात १० लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या लोकांच्या घरांना आग लावण्यात आली, त्यात ते जिवंत जळले आणि मरण पावले. याशिवाय मोठ्या प्रमाणात लोक जखमी झाल्याचे वृत्त आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बीरभूम जिल्ह्यातील बारशाल ग्रामपंचायतीचे उपप्रमुख भादू शेख यांची सोमवारी हत्या करण्यात आली. त्यानंतरच रात्री ही जाळपोळीची घटना घडली, ज्यात १० जणांना जिवंत जाळण्यात आले. भादू शेख हा बोगतुई गावचा रहिवासी होता.
मिळालेल्या माहितीनुसार, बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील रामपुरहाटमध्ये टीएमसी उपाध्यक्षाच्या हत्येनंतर बदला घेण्यासाठी ही घटना घडवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. हिंसाचारानंतर घटनेची माहिती मिळताच डीएमसह बीरभूमचे सर्व बडे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सोमवारी रात्री घडलेल्या या हिंसाचारानंतर 10-12 घरांना लावण्यात आलेल्या आगीत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर, एकाच घरातून 7 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, अशी माहिती बीरभूमच्या अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितली.मिळालेल्या माहितीनुसार, बंगालच्या बीरभूम जिल्ह्यातील रामपुरहाटमध्ये टीएमसी उपाध्यक्षाच्या हत्येनंतर बदला घेण्यासाठी ही घटना घडवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. हिंसाचारानंतर घटनेची माहिती मिळताच डीएमसह बीरभूमचे सर्व बडे अधिकारीही घटनास्थळी पोहोचले असून, पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे. सोमवारी रात्री घडलेल्या या हिंसाचारानंतर 10-12 घरांना लावण्यात आलेल्या आगीत आतापर्यंत 10 जणांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत. तर, एकाच घरातून 7 जणांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहेत, अशी माहिती बीरभूमच्या अग्निशमन अधिकाऱ्याने सांगितली.