पिसुर्लेवासीयांचा प्रश्न शेतकरी करतात संताप व्यक्त
प्रतिनिधी / पणजी
पिसुर्ले येथील शेतकऱयांसह हनुमंत परब यांना मारहाण करणाऱया पोलिसां विरोधात अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आलेली नसल्याने पिसुर्ले परिसरात संताप व्यक्त होत आहे. परब यांनी वाळपई पोलीस स्थानकाचे निरीक्षक प्रजोत फडते तसेच उपअधीक्षक एकोस्कर यांच्या विरोधात पोलीस महासंचालकांकडे तक्रार दाखल केली होती. तत्कालीन पोलीस महासंचालक इंद्रदेव शुक्ला यांनी चौकशी करण्याचे आदेश जारी केले होते. व आपल्याला अहवाल सादर करण्यास उत्तर गोवा पोलीस अधीक्षकांना बजाविले होते.
दरम्यान पोलीस महासंचालक इंद्रदेव शुक्ला हे निवृत्त झाले असून त्यांच्या जागी नवे पोलीस महासंचालक म्हणून जस्पाल सिंग (आयपीएस अधिकारी) यांनी ताबा घेतलेला आहे. जस्पाल सिंग यांना याबाबत विचारले असता आपण या प्रकरणाची चौकशी करून योग्य तो निर्णय घेईन असे सांगितले होते मात्र अद्याप कोणताच निर्णय घेतल्याचे दिसून येत नाही.
हनुमांत परब यांच्यासह शेतकऱयांना मारहाण प्रकरणातील मुख्य सूत्रधार वाळपई पोलीस स्थानकाचे निरीक्षक व उपअधीक्षक अद्याप मोकाट फिरत असून जणू काही घडलेलेच नसल्यासारखे ते आपल्या कामात व्यस्त असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे सर्व सामान्य लोकांना न्याय मिळणार की नाही असा प्रश्न निर्माण झाला आहे. शेतकऱयंनी आपल्या रास्त मागणीसाठी शांततेत आंदोलन करणे चुकीचे आहे काय असा प्रश्न पिसुर्ले भागातील नागरीकांनी उपस्थित केला आहे. विनाकारण शेतकऱयांना मारहाण करणाऱया पोलिसांर कारवाई का होत नाही असाही प्रश्न शेतकरी उपस्थित करीत आहेत.
पिसुर्ले येथील सुमारे 128 एकर शेत जमिनीत खनीजाचा साठ करून ठेवलेला आहे. त्यामुळे शेतकऱयाना मोठय़ा नुकसानीला सामोर जावे लागत आहे. ज्यांच्या जमिनीत खनिजाचा साठा करून ठेवण्यात आले आहे त्यांना नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱयांनी केली होती. त्याबाबत त्यांनी न्यायालयाची दारेही ठोठावली होती. शेतकऱयांची मागणी पूर्ण करून शेतकऱयांच्या जमीनीतील खनीज त्वरीत उचला असा आदेश उच्च न्यायालयाने दिला होता. खाणमालकांनी खनिज उचल्याण्याची तयारी दाखविली मात्र शेतकऱयांची मागणीपूर्ण करण्याकडे कुणीच लक्ष देत नसल्याचे दिसून येत आहे. म्हणून शेतकऱयांनी मामलेदारांकडे निवेदन सादर केले होते. पाच दिवसांच्या आत शेतकऱयांना नुकसान भरपाई द्या अन्यथा खनीज वाहतूक होऊ देणार नाही. निवेदनात दिलेली मुदत संपल्यानंतर शेतकऱयांनी आंदोलन सुरु केले होते. यावेळी आंदोलन मोडीत काढण्यासाठी आंदोलनाचे प्रमुख हनुमंत परब व अन्य शेतकऱयांना पोलिसांकडून बेदम मारहाण करण्यात आली होती. सरकारी यंत्रणा ही सर्व सामान्य लोकांची नसून ती खाण मालकांची बनली असल्याचा आरोप शेतकऱयांनी केला होता. आमच्या शेतजमीनी आमच्या डोळ्यादेखत वाया जात आहे. आम्ही मागणी केल्यास कुणी ऐकून घेत नाही आणि आंदोलन केल्यास मारहाण केली जाते त्यामुळे गोव्यातील सरकार हे सर्वसामान्य जनतेचे की खाण मालकांचे असा संताप्त प्रश्न पिसुर्लेवासीयांनी केला आहे.