कृतज्ञता पर्वात रेल्वेची स्मृती लाख मोलाची
सुधाकर काशीद/कोल्हापूर
कोल्हापूर सारख्या संस्थानाचा राजा झाल्यावर एखाद्या राजाने पुढचा महिनाभर केवळ आनंद सोहळाच साजरा केला असता. आणि त्याला कोणी आक्षेपही घेतला नसता. पण राजर्षी शाहू महाराज असे एक व्यक्तिमत्त्व की, त्यांनी राज्याभिषेकाच्या दुस्रया दिवशी पहिले लोक कल्याणकारी काम म्हणून कोल्हापूर ते मिरज या लोहमार्गाचा पाया घातला. आणि कोल्हापुरातून निघालेला लोहमार्गाचा फाटा संस्थांच्या पूर्ण खर्चातून मिरजेपर्यंत नेऊन जोडला. याहून विशेष हे की, लोहमार्ग चर्चेच्या जंजाळात अडकवून न ठेवता 3 मे 1888रोजी कामाला सुरुवात केली व 21 एप्रिल1891 रोजी म्हणजे फक्त दोन वर्षाच्या अवधीत या लोहमार्गावरून पाहिली रेल्वे मिरजेच्या दिशेने धावू लागली.
मात्र रेल्वे स्थानक नेमके कोठे असावे या संदर्भात या लोहमार्ग पायाभरणी पूर्वी दोन-तीन शक्यतांची पहाणी झाली होती. टेंबलाई टेकडीच्या उत्तर किंवा दा†क्षण बाजूनेच रेल्वे मिरजेच्या दिशेला जाणार असल्याने त्या परिसरात रेल्वे स्थानकाचा एक विचार होता. मंगळवार पेठेतील पद्माला तलाव परिसराचाही विचार झाला. पण पदमाळ्याचा भाग रेसिडेन्सी म्हणजे ब्रिटिश अधिकार्यांच्या वसाहतीपासून लांब आा†ण तेथे स्थानक झाल्यास दोन पूल आणखी बांधावे लागतील म्हणून पद्माळा ऐवजी सध्याची जागा निश्चित करण्यात आली. या जागेला त्याकाळी घोटाळे तलावाचा पा†रसर म्हणून ओळखले जात होते ही जागाही संस्थांनची. त्यामुळे ही जागा आत्ताच्या रेल्वेस्थानका साठी देण्यात आली. 3 मे 1988रोजी राजश्री शाहू महाराजांच्या हस्ते या जागेवर रेल्वे स्थानकाची पायाभरणी करण्यात आली.
महाराजांच्या राज्याभिषेकाच्या दुस्रया दिवशी या पहिल्या सार्वजनिक कामाची पायाभरणी त्यांनी केली.
कोल्हापूरहून मिरजेला जाणाया या लोहमार्गाची लांबी 48 किलो मीटर होती. त्यासाठी 22 लाख 99 हजार चाळीस रुपये खर्च आला.हा सारा खर्च कोल्हापूर संस्थांनने केला . कोल्हापूर स्टेट रेल्वेच्या या मार्गाचे उदघाटन शाहू महाराज व मुंबई इलाख्याचे त्यावेळचे गव्हर्नर लॉर्ड हŸरीस यांच्या हस्ते 20 एप्रिल 1891 रोजी झाले प्रत्यक्षात पहिली रेल्वे 21 एा†प्रल रोजी मिरजेच्या दिशेने धावू लागली. हा मार्ग दळणवळणाच्या दृष्टीने सुस्थितीत ठेवण्यासाठी सदर्न मराठा रेल्वे या कंपनीकडे कराराने सोपवण्यात आला. 1949 ला कोल्हापूर संस्थान मुंबई इलाख्यात समाविष्ट झाल्यानंतर मद्रास अँन्ड मराठा रेल्वेत हा कोल्हापूर मिरज मार्ग समाविष्ट करण्यात आला. मीटरगेज पद्धतीच्या या लोहमार्गाचे रूपांतर 971 सलीप ब्राŸडगेज मध्ये झाले व कोल्हापुरातून पा†हली महालक्ष्मी एक्सप्रेस मुंबईच्या दिशेने धावू लागली.
शाहू महाराजांनी पायाभरणी व उदघाटन केलेल्या या कोल्हापूर मिरज रेल्वे मार्गाने आज पुणे, मुंबई, नागपूर दिली, तिरुपती, बेंगळूर, अहमदाबाद ,धनबाद पर्यंत आपला विस्तार केला आहे. केवळ प्रवासी वाहतूक नव्हे तर, मालवाहतूकीतही आघाडी घेतली आहे. शाहुपुरी व्यापारपेठेत व्यापारी पेढीच्या मागच्या बाजूपर्यंत रेल्वे रूळ टाकण्याची दूरदृष्टी शाहू महाराजांनी दाखवली होती. आणि रेल्वे स्थानक पा†रसरात अधिकाधिक वस्ती व्हावी यासाठी स्वस्तात जागाही दिली होती.
शाहूराजांनी रेल्वेमार्गाचा संस्थांनच्या खर्चातून पाया घातला म्हणूनच हा पुढचा पला गाठता आला हे वास्तव आहे. आणि राजर्षी शाहु स्मृती पर्व काळात शाहू महाराजांचा हा विकासातील महत्त्वाचा वाटा या पिढीला माहीत असण्याची गरज आहे.
कोल्हापूर मिरज रेल्वेमार्गाचा 1891 सालचा खर्च…. 22 लाख 99 हजार 40
रेल्वे तिकीटाचे त्यावेळचे दर
कोल्हापूर रूकडी– दोन आणे.
कोल्हापूर हातकणंगले तीन आणे तीन पैसे.
कोल्हापूर उदगाव ( जयसिंगपूर) पाच आणे तीन पैसे.
कोल्हापूर मिरज सहा आणे तीन पैसे. ( सहापैसे म्हणजे एक आणा).
कोल्हापूर मिरज रेल्वे प्रवास वेळ 14 तास.
कोल्हापूर रेल्वे स्थानक उद्घाटन 1891