अमृतधन-धनसागर योजनांसाठी केवळ 4 दिवस
प्रतिनिधी /बेळगाव
गुढीपाडव्याला सुरू झालेले नवे वर्ष ग्राहकांना अधिक सुखदायी ठरण्यासाठी खास लोकाग्रहास्तव तरुण भारत सौहार्द सरकारी नियमितने आपली प्रचंड प्रतिसाद मिळालेली लोकप्रिय ‘अमृतधन मुदत ठेव योजना’ गुंतवणुकीकरिता पुन्हा खुली केली आहे. वाढत्या ग्राहकसंख्येने मिळालेल्या प्रतिसादाने या योजनेची पुनर्भेट भरघोस यशस्वी ठरली आहे.
अमृतधन योजनेंतर्गत 1 लाखाच्या गुंतवणुकीवर 27 महिन्यांत सव्वा लाख परतावा मिळेल. किमान गुंतवणूक 10,000 किंवा त्या पटीत करता येईल. याचप्रमाणे धनसागर रिकरिंग ठेव योजनेंतर्गत दरमहा किमान 600 रुपये पाच वर्षे तीन महिने भरल्यास 50 हजार परतावा मिळणार आहे. दि. 30 एप्रिल ही गुंतवणुकीसाठी अंतिम मुदत असेल. पुन्हा मिळत असलेल्या या संधीचा ग्राहकांनी जरूर लाभ घ्यावा. अधिक माहितीसाठी तरुण भारत सौहार्द सहकारी नियमित नार्वेकर गल्ली, बेळगाव 0831-2424777 किंवा 9108540877 या क्रमांकाशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.