मराठा मंडळ कॉलेजसमोरील गटारीला उतार नसल्याने नागरिकांचा आक्षेप : अधिकाऱयांना धरले धारेवर
प्रतिनिधी /बेळगाव
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत शहरात विविध विकासकामे राबविण्यात येत आहेत. मात्र शहरातील विकासकामे व्यवस्थित आणि दर्जेदार होत नसल्याच्या तक्रारी वाढल्या आहेत. महापालिका मुख्य कार्यालयाजवळच असलेल्या मराठा मंडळ कॉलेजसमोरील गटारीला उतार नसल्याचे निदर्शनास आल्याने नागरिकांनी आक्षेप घेतला. तसेच नगरसेवक मतवाले यांनी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱयांना धारेवर धरून काम थांबविण्याची सूचना केली.
स्मार्ट सिटी योजनेंतर्गत प्रमुख रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. गटारीचे बांधकाम तसेच अर्धवट असलेली कामे पूर्ण करण्यात येत आहेत. गँगवाडी ते मराठा मंडळ कॉलेजपर्यंतच्या गटारीचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. या अंतर्गत मराठा मंडळ कॉलेज परिसरातील गटारीचे बांधकाम करण्यात येत आहे. पण सदर गटारीचे बांधकाम करताना व्यवस्थित उतार नसल्याचे स्थानिक नागरिकांच्या निदर्शनास आले. त्यामुळे नागरिकांनी आणि परिसरातील मालमत्ताधारकांनी याबाबत कंत्राटदार आणि स्मार्ट सिटी कंपनीच्या अधिकाऱयांकडे तक्रार केली. गटारीचा उतार व्यवस्थित नसल्यास नागरिकांच्या घरांमध्ये पावसाचे पाणी शिरण्याचा धोका आहे. त्यामुळे स्लोप व्यवस्थित करावा, असे सांगून काम बंद ठेवण्याची सूचना केली. पण नागरिकांच्या सूचनेकडे दुर्लक्ष करून कंत्राटदाराने गटारीच्या काँक्रिटीकरणाचे काम दुसऱया बाजूने सुरू केले. यामुळे संतापलेल्या नागरिकांनी याबाबत नगरसेवकांकडे तक्रार केली. त्यामुळे मतवाले आणि पठाण हे कामाच्या ठिकाणी दाखल होऊन कंत्राटदार आणि अधिकाऱयांकडे गटारीच्या बांधकामाची विचारणा केली. पण अधिकाऱयांनी व्यवस्थित उत्तर दिले नाही. गटारी उताराला असल्याचे सांगून वरि÷ अधिकाऱयांकडे तक्रार करण्याची सूचना केली. त्यामुळे नगरसेवकदेखील संतापले. गटारीच्या बांधकामाचे एस्टिमेंट आणि वर्कऑर्डर दाखवा, अशी विचारणा केली. गटारीला उतार देऊनच बांधकाम करा, अन्यथा काम बंद करा, अशी सूचना केली. त्यामुळे हे काम काहीवेळेसाठी थांबविले. वरि÷ अधिकाऱयांशी संपर्क साधून याबाबत तक्रार केली. तसेच स्मार्ट सिटीच्या कामाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात आली.