प्रतिनिधी /पणजी
करंझाळे, ताळगांव येथे साकारत असलेला राष्ट्रीय जलक्रीडा संस्थेचा प्रकल्प गोव्याच्या मुक्तीदिनी, 19 डिसेंबर रोजी कार्यरत होईल, असा विश्वास केंद्रीय मंत्री श्री. श्रीपाद नाईक यांनी व्यक्त केला. भव्य अशा या प्रकल्पाच्या कामाचा आढावा घेतल्यानंतर पत्रकारांशी श्री. नाईक बोलत होते.
या बैठकीला गोव्याचे पर्यटन मंत्री श्री. रोहन खंवटे, इंडियन इंस्टिटय़?शन ऑफ टय़?रिझम अँड ट्रव्हल मॅनेजमेंट, ग्वाल्हेर चे संचालक प्रा. अलोक शर्मा, राष्ट्रीय जलक्रीडा संस्थेचे नोडल अधिकारी प्रा. सुधिश्ना बाबू एस., भारतीय टय़?रिझम आणि गोवा पर्यटन महामंडळाचे अधिकारी, जीएसआयडीसीचे अधिकारी उपस्थित होते.
पर्यटन मंत्री असताना श्री. श्रीपाद नाईक यांनी हा भव्य प्रकल्प गोव्यात आणला. 2014 साली सुरू झालेल्या या प्रकल्पाचे काम काही कारणांमुळे रेंगाळले. या प्रकल्पासाठी केंद्राकडून 57 कोटी मंजूर झाले होते. परंतु, कामाची गती रोडावल्यामुळे मंजूर झालेली रक्कम कमी पडू लागली आहे.
कामाचा आढावा घेतल्यानंतर या प्रकल्पाचे काम करणाऱया जीएसआयडीसीला सुधारित अंदाज तयार करून वाढीव निधीसाठी पर्यटन मंत्रालयाला प्रस्ताव पाठविण्यास आपण सांगितले आहे. प्रकल्पाचे काम पूर्ण होण्यासाठी अजून 17 ते 18 कोटींची गरज आहे, अशी माहिती श्री. नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.
सिव्हिल काम जवळपास पूर्ण झालेले आहे. जलतरण तलाव, संरक्षक भिंत आणि आतले थोडेफार काम बाकी आहे. निधी उपलब्ध झाल्यानंतर लवकरात लवकर उर्वरित काम पूर्ण करण्यात येईल, असे श्री. नाईक यांनी पुढे सांगितले.
तथापि, राष्ट्रीय जलक्रीडा संस्थेतर्फे या वास्तूत काही अभ्यासक्रम सुरूही झालेले आहेत. आतापर्यंत 2000 गोमंतकीयांनी आणि देशाच्या इतर भागांतील 7000 विद्यार्थ्यांनी नोकरीची हमी देणारे अभ्यासक्रम पूर्ण केलेले आहेत. गोव्यातील बेरोजगार युवकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन श्री. नाईक यांनी केले आहे.
या वास्तूत हॉस्टेलची सुविधाही सुरू झालेली आहे. एकदा उद्धाटन सोहळा झाला की जीएसआयडीसी हा प्रकल्प राष्ट्रीय जलक्रीडा संस्थेकडे सुपूर्द करणार आहे. जीएसआयडीसी अधिकाऱयांनी येत्या 19 डिसेंबर पूर्वी काम पूर्ण करण्याचे आश्वासन आढावा बैठकीत दिलेले आहे, असे श्री. नाईक यांनी सांगितले.