केंद्राकडून जाहीर होणार तारीख : पॅप्टन ऑफ पोर्टमधील सुत्रांची माहिती
प्रतिनिधी /पणजी
शापोरा येथील प्रस्तावित तरंगत्या जेटीला झालेल्या जोरदार विरोधाच्या पार्श्वभूमीवर तो निर्णय रद्द करण्यात आला असून पणजीत मांडवी नदीत बांधण्यात येणाऱया दुसऱया जेटीचा अधिक विस्तार करण्यात येणार आहे. त्या जेटीच्या उद्घाटनावेळीच राज्यातील पहिल्या सोलर फेरीबोटीचेही उद्घाटन करण्यात येणार आहे, अशी माहिती पॅप्टन ऑफ पोर्ट खात्यातील सुत्रांकडून प्राप्त झाली आहे.
केंद्र सरकारने राज्यात चार तरंगत्या जेटी बांधण्यास मंजुरी दिली होती. त्यातील जुने गोवे व पणजीत मांडवी नदीतील जेटी पूर्ण झालेल्या आहेत. शापोरा नदीत आणखी एक जेटी बांधण्यात येणार होती. परंतु या जेटीच्या आडून तेथे पॅसिनोंचा प्रवेश होईल या भीतीपोटी पारंपरिक मच्छिमार आणि स्थानिकांनी तिला जोरदार विरोध केला होता. त्यामुळे तो प्रकल्प रद्द करण्यात आला आहे. आता तिसऱया जेटीचे बांधकाम पणजी-बेती फेरीधक्क्याच्या परिसरात सुरू असून त्याचा अधिक विस्तार करण्यात येणार आहे, अशी माहिती देण्यात आली.
या दरम्यान नदी परिवहन खात्याने राज्यातील पहिल्या सोलर फेरीबोटीची निर्मिती केली आहे. सुमारे 4.2 कोटी रुपये खर्चाची ही फेरीबोट बांधून तयार असून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहे. तिसऱया जेटीच्या सोबतच तिचेही उद्घाटन करण्यात येणार आहे. त्यासंबंधी तारीख मात्र केंद्राकडून निश्चित करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
दिवार येथील एका शिपयार्डमध्ये या सोलर हायब्रिड इलेक्ट्रिक फेरीबोटीची बांधणी करण्यात आली आहे. 60 नॉटिकल माईल्स प्रतीतास वेगाने धावण्याची क्षमता असलेल्या या बोटीतून एकावेळी 60 प्रवाशी प्रवास करू शकणार आहेत. ही फेरीसेवा जास्त करून पणजी-चोडण मार्गावर चालविण्यात येणार आहे. त्याशिवाय मांडवी, झुवारी नदीत रिव्हर क्रूझ म्हणुन पर्यटन दर्शनासाठीही तिचा वापर करण्यात येऊ शकतो, अशी माहिती प्राप्त झाली आहे.
सध्या राज्यात 19 फेरीमार्ग असून तेथे 39 पारंपरिक फेरीबोटी प्रवाशांना सेवा देत आहेत. त्यात आता सोलर हायब्रिड इलेक्ट्रिक फेरीबोटीची भर पडणार आहे. हा प्रयोग यशस्वी झाल्यास भविष्यात अशाप्रकारच्या आणखीही फेरीबोटी बांधण्यात येणार आहेत. त्याशिवाय लवकरच दोनापावल मार्गे पणजीतून वास्को अशी फेरीसेवा सुरू करण्याचाही सरकारचा विचार आहे. या फेरीमुळे कुठ्ठाळीमार्गे पणजी -वास्को मार्गावर पडणारा वाहनांचा ताण कमी होईल. तसेच प्रवासाचा वेळ आणि इंधनावरील खर्चाचीही बचत होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.