कारखाना सहकार तत्त्वावर चालविण्याचे आशा पल्लवित : बचाव समितीच्या प्रयत्नांना यश
करमाळा/प्रतिनिधी
शासनाच्या एकरकमी परतफेड योजनेअंतर्गत 11 कोटी रुपये शिखर बँकेकडे भरा व उर्वरित कर्जाचे पुनर्गठन करून घ्या अशा आशयाचे पत्र राज्य सहकारी बँकेने सहा जून 2022 रोजी एटीएस पत्र क्रमांक 1050 प्रमाणे आदिनाथ सहकारी साखर कारखान्याच्या कार्यकारी संचालक व संचालक मंडळाला दिले आहे. शिखर बँकेच्या या निर्णयामुळे आता पुन्हा एकदा आदिनाथ सहकारी साखर कारखाना सहकारी तत्त्वावर सुरू होण्या बद्दलच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
तीनशे कोटी रुपयांची मालमत्ता असलेल्या आदिनाथ सहकारी साखर कारखाना बेकायदेशीर रित्या सर्व नियम धाब्यावर बसवून हा कारखाना बारामती अग्रो ला चालविण्यास देण्याचा प्रयत्न चालू होता दोन वर्षांपूर्वी बारामती अग्रोने आदिनाथ ची लिलावाची बोली लावून प्रत्यक्षात मात्र आदिनाथ कारखाना बंद कसा राहील हा दृष्टिकोन ठेवून आदिनाथ ची लिलाव प्रक्रिया लांबवली यामुळे ऊस उत्पादक शेतकरी सभासद प्रचंड संतापाची लाट होती.
सोलापूर जिल्ह्यातील इतर कारखान्यांना 300 ते 400 कोटी रुपयांचे कर्जाचे पुनर्गठन करून दिले
मात्र आदिनाथ कारखान्याचं केवळ 45 कोटी रुपयांच्या थकबाकीसाठी लिलाव काढला होता. या शिखर बँकेचा गैर कारभाराला आदिनाथ चे माजी कार्यकारी संचालक हरिदास डांगे यांनी बचाव समितीच्या माध्यमातून विरोध केला होता.
सध्या पुणे येथील कर्ज वसुली प्राधिकरण न्यायालयात आदिनाथ वसुलीची आदिनाथ कडील कारखान्याची कर्ज वसुलीची केस सुरू आहे यामुळे या निर्णयाचा या निकालावरील परिणाम होण्याची शक्यता आहे.
याबाबत बोलताना हरिदास डांगे म्हणाले की आदिनाथ कारखाना शेतकऱ्यांच्या मालकीचं रहावा यासाठी आमचे प्रयत्न सुरू आहेत आता राज्य सहकारी बँकेने केवळ अकरा कोटी रुपये भरून कर्जाचे पुनर्गठन करून देण्याचे लेखी पत्र दिले आहे शिवाय दिल्ली येथील एनसीडीसी बँकेने सुद्धा पाच टक्के रक्कम भरून कर्जाचे पुनर्गठन न करून देण्याचे आश्वासन दिले आहे यामुळे आदिनाथ सहकारी साखर कारखाना सहकार तत्त्वावर चालविण्याचे आशा पल्लवित झाल्या आहेत.
आजअखेर कारखान्याकडे राज्य सहकारी बँकेचे 64 कोटी रुपये कर्ज असून त्यावरील पंचेचाळीस कोटी रुपये व्याज आहे असे मिळून एकशे दहा कोटी रुपये कर्ज आहे यापैकी 55 कोटी रुपयाची साखर कारखान्यात शिल्लक आहे आता शिखर बँकेने नमते घेऊन आदिनाथ कारखान्याच्या संचालक मंडळाला एक रकमी परतफेड योजने मध्ये सहभागी होऊन कारखाना ताब्यात घेण्याची ऑफर दिली आहे. आता आदिनाथ कारखान्याचे संचालक मंडळ व बचाव समितीचे पदाधिकारी कोणती भूमिका घेणार याकडे लक्ष लागून राहिले आहे.
बारामती ॲग्रो ने करार करून सुद्धा दोन वर्ष कारखाना बंद ठेवून करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत आणले आहे करमाळा तालुक्यातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांना अडचणीत अण्णांनी आता तरी या स्पर्धेतून माघार घेऊन कारखाना सभासदांच्या मालकीचा ठेवावा. आता जर रोहित पवार यांनी पुन्हा आदिनाथ बंद पाडण्यासाठी सुभाष गुळवे ला पुढे करून न्यायालयातून प्रयत्न केल्यास बळीराजा शेतकरी पवार कुटुंबांच्या विरोधात रस्त्यावर उतरेल असा इशारा अण्णा सुपनर यांनी दिला आहे.