ताकारी, म्हैसाळ, टेंभू सूरू करण्याची मागणी
सांगली/प्रतिनिधी
सांगली जिल्ह्यात अद्यापही पावसाची रिमझिम सुरू आहे. पण, पाणलोट क्षेत्रात दमदार पाऊस असल्याने धरणांच्या पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होऊ लागली आहे. शुक्रवारी सायंकाळपर्यंत अलमट्टी धरण ५१.८४ टक्के भरले आहे. तर वारणा धरण ४३ टक्के आणि कोयना धरण २३ टक्के भरले आहे.
कृष्णा वारणा नद्यांच्या पाणी पातळीत संथ गतीने वाढ होऊ लागली आहे. एका बाजूला महापूराची चर्चा सुरू असतानाच जिल्ह्याच्या पूर्व भागात अद्यापित दमदार पाऊस झालेला नाही त्यामुळे ताकारी म्हैशाळ आणि टेंभू योजनांची आवर्तने सुरू करा अशी मागणी होत आहे.
दरम्यान शुक्रवारी सायंकाळी वारणा धरणातील पाणीसाठा १४.८३ टीएमसी तर कोयना धरणातील साठा २३.८९ टीएमसी झाला आहे कोयना पाणलोट क्षेत्रात दिवसभरात ३९, महाबळेश्वर ५३ आणि नवजामध्ये ४८ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. अलमट्टी धरणातील विसर्ग दोन दिवसापासून स्थिर ठेवण्यात आला असून शुक्रवारी हे धरण ५१.८४ टीएमसी भरले.
जिल्ह्यात गेल्या २४ तासात सरासरी ११.३ मि. मी. पावसाची नोंद झाली असून शिराळा तालुक्यात सर्वाधिक २६.४ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात गेल्या २४ तासात पडलेला पाऊस व कंसात १ जून पासून आत्तापर्यंत पडलेल्या पावसाची तालुकानिहाय आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे. मिरज 9.4 (109.8), जत 9.2 (106.4), खानापूर-विटा 8.5 (101.4), वाळवा-इस्लामपूर 11.9 (112.9), तासगाव 9.9 (91.8), शिराळा 26.4 (287.4), आटपाडी 7 (77.6), कवठेमहांकाळ 13 (98.6), पलूस 8.7 (71.5), कडेगाव 7.7 (88.5).
जिल्ह्यातील वारणा धरणात 15.44 टी.एम.सी. पाणीसाठा
वारणा धरणात शुक्रवारी 15.44 टी.एम.सी. पाणीसाठा असून या धरणाची साठवण क्षमता 34.40 टी.एम.सी. इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे.
विविध धरणातील पाणीसाठा व साठवण क्षमता कंसात टी.एम.सी. प्रमाणात पुढीलप्रमाणे. कोयना 25.23 (105.25), धोम 4.55 (13.50), कन्हेर 2.69 (10.10), वारणा 15.44 (34.40), दूधगंगा 9.74 (25.40), राधानगरी 3.92 (8.36), तुळशी 1.64 (3.47), कासारी 1.54 (2.77), पाटगांव 1.79 (3.72), धोम बलकवडी 1.29 (4.08), उरमोडी 4.45 (9.97), तारळी 2.44 (5.85), अलमट्टी 70.58 (123).
विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाव्दारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे. कोयना -निरंक, धोम – निरंक, कण्हेर – निरंक, वारणा 714, दुधगंगा 700, राधानगरी 1300, तुळशी – निरंक, कासारी 250, पाटगांव – निरंक, धोम बलकवडी – निरंक, उरमोडी – निरंक, तारळी – निरंक व अलमट्टी धरणातून – निरंक, क्युसेक्स विसर्ग सुरू आहे.