प्रतिनिधी/ बेळगाव
गेल्या दहा दिवसांपासून सुरू झालेल्या संततधार आणि दमदार पावसामुळे शहरासह ग्रामीण भागातील घरांची पडझड सुरूच झाली आहे. आतापर्यंत अनेक घरे कोसळली आहेत. सुदैवानेच या घटनांमध्ये अद्यापपर्यंत कोणीही जखमी झाले नाही. मात्र, घरांची पडझड होत असल्यामुळे सर्वत्रच भीतीचे वातावरण पसरले आहे. गेल्या तीन दिवसांपासून सुरू झालेल्या दमदार पावसामुळे भांदूर गल्ली, अनगोळ येथील सुनील धनाजी शिंदोळकर आणि परशराम कृष्णा शिंदोळकर यांचे घर कोसळले आहे. यामुळे या दोघांचेही मोठे नुकसान झाले आहे. घर पडण्याची शक्मयता असल्याने ही दोन्ही कुटुंबे दुसऱया ठिकाणी स्थलांतरित झाली होती. त्यामुळे मोठा अनर्थ टळला
आहे. शहरामध्ये दोन दिवसांपासून घरे कोसळण्याची मालिकाच सुरू झाली आहे. वडगाव, शहापूर, अनगोळ यासह इतर परिसरात अनेक घरे कोसळली आहेत. त्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. तेव्हा जिल्हा प्रशासनाने तातडीने या सर्वांना मदत करावी, अशी मागणी होत
आहे.
हलगा येथेही कोसळले घर
हलगा येथील लक्ष्मण बोम्मण्णावर यांच्या घराची भिंत कोसळली. त्यावेळी सुदैवानेच त्या ठिकाणी कोणीही नसल्याने बचावले. शुक्रवारी रात्री ही घटना घडली आहे. लक्ष्मण बोम्मण्णावर हे कुलीकाम करून आपला उदरनिर्वाह चालवतात. मात्र, गेल्या दहा दिवसांपासून सुरू झालेल्या पावसामुळे स्वयंपाक घराला असलेली त्यांची भिंत कोसळली. त्यामुळे या कुटुंबावर बेघर होण्याची वेळ आली आहे. शुक्रवारी रात्री अचानक हे घर कोसळल्यामुळे त्यांना दुसरीकडे आसरा घ्यावा लागला आहे. तेव्हा तलाठी तसेच तहसीलदार यांनी तातडीने भेट देऊन त्याची पाहणी करावी, अशी मागणी होत आहे.