माजी विद्यार्थी-नागरिकांच्या बैठकीत निर्णय
प्रतिनिधी /खानापूर
रविवारी झालेल्या बैठकीत गर्लगुंजी येथील जमीनदोस्त झालेली शाळा उभारण्याचा संकल्प करण्यात आला. येथील चंद्रकांत पाटील यांनी शाळेसंदर्भात बोलाविलेल्या बैठकीत शाळा उभारणीचा निर्णय घेण्यात आला. बैठकीला गावातील माजी विद्यार्थी व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
चंद्रकांत पाटील यांनी प्रास्ताविक करून जमीनदोस्त झालेली शाळा लवकरात लवकर लोकवर्गणीतून कशी उभी करता येईल, यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. यासाठी सर्वांनी सहकार्य करावे, असे आवाहन केले. यावेळी सुरेश भातकांडे, प्रसाद पाटील, गोपाळ पाटील, पांडुरंग सावंत यासह अनेकांनी शाळा उभारणीसाठी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. पुढील बैठक 31 जुलै रोजी पुन्हा बोलाविण्याचा निर्णय घेण्यात आला. बैठकीत निधी संकलनाबाबत तसेच शासकीय स्तरावरून मदत मिळविणे यासह शाळेची इमारत लवकरात लवकर कशी उभी करता येईल, याबाबत चर्चा झाली. यावेळी हणमंत मेलगे, महेश कुंभार, वाय. एम. पाटील, पिराजी पाखरे, चंद्रकांत भातकांडे, नारायण सावंत, सातेरी गोरे, शिला पाटील, परशराम पालकर, सतीश पाटील, प्रकाश गोरे, गंगाराम बिरजे व कार्यकर्ते उपस्थित होते.