दान दिलेली जागा पुन्हा बळकावण्याचा प्रयत्न : 23 पर्यंत निर्णय न झाल्यास मोर्चा काढण्याचा इशारा
वार्ताहर /धामणे
नागेनहट्टी गावच्या स्मशानभूमीची 20 गुंठे जागा बळकावल्याने स्मशानभूमीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. 23 ऑगस्ट रोजी यावर निर्णय घेतला जाणार आहे. निर्णय योग्य न झाल्यास ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा इशारा दिला आहे.
नागेनहट्टी गावच्या स्मशानभूमीचे मोजमाप करून देण्यासाठी बेळगावचे तहसीलदार व नंदिहळ्ळी ग्राम पंचायतीचे सर्व पदाधिकारी, तलाठी, पीडीओ आणि गावकरी उपस्थित असताना मोहन अंगडी व बाळेकुंद्री कुटुंबीयांनी उपस्थित अधिकाऱयांना अर्वाच्य शिवीगाळ केल्याने गावकरी आक्रमक झाले. त्यामुळे अंगडी व बाळेकुंद्री यांनी शेवटी 11 गुंठे जागा देण्याचे सांगितले. परंतु, गावकरी 20 गुंठे जमीन मागणीवर ठाम राहिल्याने पुन्हा मंगळवार दि. 23 ऑगस्ट रोजी निर्णय घेण्याचे ठरले असले तरी निर्णय योग्य झाला नाहीतर बुधवारी नागेनहट्टी गावकरी जिल्हाधिकाऱयांना निवेदन देण्यासाठी मोर्चा काढणार असल्याचे गावकऱयांनी सांगितले.
1983 साली स्मशानभूमीसाठी दान दिलेली जागा स्मशानभूमी म्हणून नोंद असताना मोहन अंगडी आणि बाळेकुंद्री कुटुंबीयांनी विकत कशी घेतली? असा प्रश्न विचारत 2016 मध्ये वरि÷ अधिकाऱयांनी मोजमाप करून स्मशानभूमीच्या जागेची हद्द करून गावकऱयांच्या ताब्यात दिली होती. परंतु, ही जागा पुन्हा त्यांनी कब्जात घेतली असल्याचे गावकऱयांनी सांगितले.
याप्रसंगी ग्रा. पं. अध्यक्षा सुवर्णा हंपण्णावर, सदस्य नारायण पाटील, कृष्णा पाटील, ओमाण्णा कार्लेकर, कल्लाप्पा पाटील, ओमाण्णा पाटील, देवेंद्र पाटील, संभाजी पाटील तसेच गावकरी उपस्थित होते.
जागा घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही
गावच्या स्मशानभूमीसाठी गेली 40 वर्षे आम्ही लढा देत आहोत. मोहन अंगडी व बाळेकुंद्री कुटुंबीयांनी राजकीय दबाव आणून स्मशानभूमीची जागा हडप केली आहे. हद्दीचे दगड काढून टाकले आहेत. सरकारी दप्तरात तशी नोंद आहे. ही जागा घेतल्याशिवाय आम्ही गावकरी आता गप्प बसणार नाही.
– नागाप्पा आपय्या बेकिनकेरी
गप्प बसणार नाही
गावच्या आसपास सरकारी जमीन नाही म्हणून निंगाप्पा अंकलेकर यांनी स्वतःची जागा गावच्या स्मशानभूमीसाठी 1983 साली दान दिली आहे. जागा सर्वे नं. 9/6 या नंबरमध्ये आहे. मोहन अंगडी व बाळेकुंद्री कुटुंबीयांनी ही जागा बळकावली आहे. परंतु, आम्ही सर्व गावकरी मिळून दाखल असलेली 20 गुंठे पूर्ण जागा घेतल्याशिवाय गप्प बसणार नाही.
– पुनाप्पा नारायण पाटील