प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील पथदीप दिवसा सुरू व रात्रीच्यावेळी बंद असा प्रकार सध्या सर्वत्रच दृष्टीस पडत आहे. शहापूर येथील कोरे गल्ली-दाणे गल्ली परिसरात मंगळवारी दुपारीदेखील पथदीप सुरू होते. यामुळे विजेचा अपव्यय होत असून, महानगरपालिकेच्या दुर्लक्षामुळे असे प्रकार घडत आहेत.
महानगरपालिकेने एकाचवेळी पथदीप सुरू व बंद होतील, अशी यंत्रणा बसविणे गरजेचे आहे. परंतु प्रत्येक विभागवार वेगवेगळे कनेक्शन असल्याने कंत्राटदाराच्या मर्जीप्रमाणे पथदीप सुरू व बंद केले जातात. यामुळे विजेचा अपव्यय होत असून, यावर अधिकाऱयांचे नियंत्रण नसल्याचे चित्र दिसत आहे. नेहमीच शहरातील एखाद्या भागात पथदीप सुरू असल्याचे दिसून येत असल्याने ऍटोमेटिक सिस्टीम बसविणे गरजेचे आहे.