महापालिकेने राबविली मोहीम : कडक धोरण राबविण्याचा विचार
प्रतिनिधी /बेळगाव
शहरातील विविध भागात भटक्मया जनावरांची संख्या वाढली आहे. भटक्मया जनावरांमुळे वाहतुकीस अडथळा होत असून वाहनधारकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागते. काहीवेळा भटक्मया जनावरांना अपघात घडत असतात. त्यामुळे ठिकठिकाणी ठाण मांडणाऱया भटक्मया जनावरांना पकडण्याची मोहीम महापालिकेच्यावतीने राबविण्यात आली आहे.
महापालिकेकडून भटकी जनावरे पकडून गो-शाळेत दाखल करण्यात येत आहेत. तरीदेखील विविध ठिकाणी ठाण मांडणाऱया भटक्मया जनावरांची संख्या कमी झाली नाही. त्यामुळे जनावरांना पकडण्याची मोहीम सातत्याने राबविण्यात येत आहे. सोमवारी देखील ठिकठिकाणी वाहतुकीस अडथळा ठरणाऱया भटक्मया जनावरांना पकडून गो-शाळेत दाखल केले. तीन ठिकाणी लहान मोठय़ा तीन जनावरांना पकडून महापालिकेच्या गो-शाळेत ठेवण्यात आले. तसेच लिंगराज कॉलेजच्या मागील बाजूस असलेल्या पोलीस वसाहत परिसरातील जनावरे पकडून गोशाळेत दाखल केली. यावेळी जनावरांना पकडताना एका जनावराने नाल्यामध्ये उडी टाकली. त्यामुळे मनपाच्या कर्मचाऱयांनी नाल्यामधील जनावराला काढून गोशाळेत नेले. यापूर्वी पकडण्यात आलेल्या जनावरांची मालकांनी सुटका करून घेतली. याकरिता दंड आकारला जातो. प्रत्येक वेळी दंड भरून जनावरे सोडवून घेत आहेत. त्यामुळे भटक्मया जनावरांच्या बंदोबस्तासाठी कडक धोरण राबविण्याचा विचार मनपाने चालविला आहे.