प्रतिनिधी/ बेळगाव
बेळगाव तालुका परिसरात वातावरणाच्या बदलामुळे नागरिकांना याचा मोठा त्रास सहन करावा लागत आहे. थंडीत मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे. अशातच मध्यंतरी ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. काही दिवसांपूर्वी पावसाने हजेरी लावली होती. याचा परिणाम पिकांवर काही प्रमाणात झाला. सध्या बेळगावचा पारा 19.6 अंशावर येऊन ठेपला असून थंडीने नागरिक हैराण झाले आहेत. यामुळे सर्वसामान्यांना आरोग्याची काळजी घ्यावी लागणार आहे. महत्त्वाचे म्हणजे ग्रामीण भागात थंडीची तीव्रता अधिक जाणवत आहे.
ऑक्टोबर गरमीचे तापमान ओसरल्यानंतर एकदम गारवा निर्माण होतो. यामुळे आजारांना आमंत्रण मिळत असल्याचे डॉक्टरांकडून सांगण्यात येते. मात्र यावषी ऑक्टोबरमध्ये पाऊस होता. यासाठी आपण दक्षता घेणे गरजेचे आहे. अशातच मागील काही दिवसांपूर्वी वातावरणात अचानक बदल होऊन पावसाने हजेरी लावली होती. सुरू झालेल्या थंडीमुळे मानवी आरोग्यावर त्याचा परिणाम काही प्रमाणात जाणवू लागतो. ऑक्टोबर महिन्यापासून आतापर्यंत या हवामानात वारंवार बदल होत आहे. यामुळे विशेषकरून सर्दी, ताप, खोकला होतो. थंडीमुळे सर्दी कमी होत नसल्याने कफ वाढून श्वासोच्छवास करण्यास त्रास होतो, यासाठी काळजी घ्यावी.
सध्या कडाक्याची थंडी पडत आहे. थंडीमुळे ग्रामीण भागात शेकोटय़ाही पेटू लागल्या आहेत. थंडीपासून बचाव करण्यासाठी अनेक जण गरम कपडे खरेदी करण्याकडेही वळले आहेत. त्याबरोबरच अनेक नागरिक डॉक्टरांचा सल्ला घेऊन आजार बळावणार नाहीत, याची काळजी घेत आहेत. मध्यंतरी ढगाळ वातावरणामुळे शेतकरी चिंतेत होते. झालेल्या पावसामुळे शेतकऱयांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले आहे. हे नुकसान होत असतानाच विट व्यावसायिकांनाही पावसाचा चांगलाच फटका बसला आहे. नैसर्गिक वातावरणाचा फटका सर्वसामान्यांनाच बसतो. आता नोव्हेंबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच थंडीने जोर धरला आहे.
आकाशात ढगाळ वातावरण आले की थंडीचा जोर ओसरतो. यामुळे नागरिकांना थंडीची जाणीव अधिक प्रमाणात होताना दिसून येते. यावर्षी अनेक शेतकऱयांच्या भातपीक कापणीच्या कामात व्यत्यय निर्माण झाला. हिवाळ्य़ाबरोबरच उन्हामध्येही पावसाने चांगलेच झोडपले आहे. परिणामी अनेकांचे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले असले तरी आता थंडीत मोठय़ा प्रमाणात वाढ झाली आहे. रात्रीच्या वेळी थंडी आणि दिवसाही थंडीचे प्रमाण वाढताना दिसत आहे.
वाढत्या थंडीमुळे अनेक जण घराबाहेर पडण्यासही धजत नाहीत. विशेषकरून पहाटे फिरणाऱयांनीही आता आपल्या वेळेत बदल केल्याचे दिसते. मात्र वातावरणाच्या बदलामुळे नागरिकांच्या आरोग्याचे प्रश्न उद्भवत आहेत. अनेक दावाखान्यांमध्ये रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचे दिसून येते. सध्या अनेक भागात थंडीने हैराण केल्याच्या बाबी सामोऱया येत आहेत. रात्री 9 ते सकाळी 8 पर्यंत थंडीचा प्रभाव जाणवतो आहे.