प्रचारात आघाडीवर असणाऱ्या निगडे पॅनेलला धक्का; सहा नऊ चेहऱ्यांना संधी, दोन विद्यमान संचालक पराभूत
कोल्हापूर प्रतिनिधी
दि कोल्हापूर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेची 2022-27 अशी पंचवार्षिक निवडणूक आरोप-प्रत्यारोपांने व धडाकेबाज प्रचाराने गाजली. मंगळवारी लागलेल्या निकालानंतर, माजी अध्यक्ष व पॅनेलचे प्रमुख उमेश निगडे यांना सत्तारूढ कणेरकर-शिंदे पॅनेलने धक्का देऊन विमान चिन्हावरील पॅनेलला विजयी केले. सभासदांच्या नाराजीमुळे सत्ताधारी जुने पॅनेलने बाजी मारत सर्वच्या-सर्व 15 जागा जिंकत बँकेवरील आपले वर्चस्व कायम राखले. चार हजाराच्या मताधिक्याने सत्तारुढ जुने पॅनेलने एकतर्फी विजय मिळवला. यामध्ये नवीन सहा चेहऱयांना संधी तर दोन विद्यमान संचालक पराभूत झाले. निकालानंतर गुलालाची उधळण व फटाके उडवण्यात आली. दोन पॅनेलसह पाच अपक्ष उमेदवार निवडणूकीत उतरले होते.
विजय उमेदवार व त्यांना मिळालेली मते
सर्वसाधारण प्रतिनिधी
शिरिष कणेरकर -8815
संभाजी जगदाळे-7756
ऍड, रविंद्र धर्माधिकारी-7637
राजन भोसले-8166
नंदकुशोर भोसले-7503
जयसिंग माने -8032
अभिजित मांगुरे-7155
ऍड. प्रशांत शिंदे -8216
मधुसुदन सावंत-7701
ऍड. यशवंतराव साळोखे- 7502
महिला प्रतिनिधी
सुनिता राऊत-8423
संध्या घोटणे-8237
अनुसूचित जाती -जमाती प्रतिनिधी
नामदेवराव कांबळे -8521
इतर मागासवर्गीय प्रतिनिधी
सुभाष भांबुरे -8934
विभुक्त जाती-भटक्या जमाती प्रतिनिधी
विश्वास काटकर-8793
संस्थापक पॅनेलचे पराभूत उमेदवार व त्यांना मिळालेली मते-
उमेश निगडे 4874, अजय इंगवले 4273, प्रतापसिंह जाधव 4230, अमोल डांगे 3795, ए.एन. देशमुख 3485, संदीप पांडुरंग पाटील 3568, अशोक बळीराम पोवार’ 4079, अतुल बोंद्रे 4627, शिवाजी वसंत मोरे 3485, रविंद्र हनुमंतसा सोळंकी 3410, प्रा.एकनाथ काटकर 4297, गीता रणजीत जाधव 4284, गीता हासुरकर 3416, प्रसाद नारायण बुलबुले 3852, अशोक विठ्ठल भास्कर 4083. अपक्ष उमेदवार – रवींद्र शामराव गुरव251, प्रकाश दिनकर जाधव 578, संभाजी विष्णू डोंगळे 63 , रणजीत जनार्दन कवाळे 423, रवींद्र शामराव गुरव 158.
चिठ्ठीतून टोमणे
मतपेटी उघडल्यानंतर काही पेटय़ामध्ये मतदारांनी चिठ्ठय़ा टाकल्याचे आढळून आले. यामध्ये कडवट प्रतिक्रिया वाचावयास मिळाल्या. यामध्ये छत्रपती शाहू महाराजांनी बहुजन सभासदांसाठी सावकार शाही नष्ट करण्यासाठी बँकाची स्थापना केली. तो यशस्वी झाला पण बँकेला गळू चिकटले. त्याचा बंदोबस्त करा. सरंमजाम शाही नष्ट झाली पाहिजे. तरूण पिढी हवी, 55 वर्षावरील सर्वांना हद्दपार करा, नवीन पिढीकडे कारभाग सोपवा, संचालकांनी काटकासरीचे धोरण आवलंबले तरच बँक गरूड झोप घेईल. आता बंद झाले, आमचे ठरलंय, उजवा हाताने एकदा द्यायचे आणि डाव्या हाताने पाचवेळा घ्याचे अशा भावाने सभासदांनी व्यक्त केल्या.