मुख्य जिल्हासत्र न्यायालयाने ठोठावली शिक्षा : अंजयेनयनगर येथील डॉक्टरच्या खुनामुळे उडाली होती खळबळ
प्रतिनिधी / बेळगाव
आपला मुलगा आपल्या सारखाच
डॉक्टर व्हावा यासाठी वडिलांनी पुरेपूर प्रयत्न केले. मात्र डॉक्टर तर झालाच नाही उलट वडिलांकडे नेहमीच पैशाची मागणी करुन भांडण करणे, पैसे दिले नाहीत तर मारबडव करणे असे प्रकार केले. एके दिवशी तर त्या मुलाने कहरच केली आणि वडिलांचा डोळ्यात मिरचीपूड टाकून पहारीने हल्ला करुन खून केला. या खूनप्रकरणी मुख्य जिल्हासत्र न्यायालयाने आरोपी मुलाला जन्मठेपची शिक्षा ठोठावली आहे.
रवी ऊर्फ रवीराज उमाकांत दंडावतीमठ (वय 40, रा. अंजनेयनगर, सेक्टर नंबर 9) असे जन्मठेपची शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. त्याने आपले वडील डॉ. उमाकांत शिवलिंगय्या दंडावतीमठ (वय 68, रा. अंजनेयनगर, सेक्टर नंबर 9) यांचे गुऊवार दि. 1 फेब्रुवारी 2018 रोजी रात्री 8.30 वाजण्याच्या सुमारास डोळ्यात मिरचीपूड टाकून त्यांचा डोक्यात पहार घालून खून केला होता. या प्रकरणी माळमारुती पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी रवीराज याला माळमाऊती पोलिसांनी अटक केली होती. तत्कालीन पोलीस निरीक्षक चन्नकेशव टिंगरीकर यांनी त्याच्यावर गुन्हा नोंदविला होता. मयत डॉ. उमाकांत यांची मुलगी डॉ. रश्मी विशाल हलगत्ती (वय 40) यांनी आपला भाऊ रवी ऊर्फ रवीराज याच्यावर माळमाऊती पोलीस स्थानकात फिर्याद दिली होती. पोलिसांनी भा.दं.वि. 302 कलमान्वये गुन्हा दाखल केला होता. यानंतर मुख्य जिल्हासत्र न्यायालयामध्ये दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते.
न्यायालयामध्ये 34 साक्षी, 68 कागदपत्रे पुरावे व मुद्देमाल तपासण्यात आले. प्रत्यक्षदर्शी साक्षीदार नव्हता. तरीदेखील न्यायालयाने ही घटना अत्यंत गंभीर आहे. त्यामुळे न्यायाधीश मुस्ताफा हुसेन सईद अजीज यांनी आरोपी रवीराज याला जन्मठेप आणि 50 हजार रुपये दंड ठोठावला. या खटल्यामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून आर. एन. चाटे यांनी काम पाहिले. त्या मुलाला शिक्षा व्हावी यासाठी त्यांनी न्यायालयासमोर युक्तिवाद मांडला होता. त्यामुळे त्याला शिक्षा झाली.
डॉ. उमाकांत दंडावतीमठ हे मुळचे बैलहोंगल तालुक्मयातील होते. अनेक वर्षांपासून अंजनेयनगर येथे स्वत:चा बंगला बांधून ते वास्तव्य कऊन होते. त्यांना डॉ. रश्मी व रवी ऊर्फ रविराज ही दोन अपत्ये आहेत. रश्मी या दंत्तवैद्य आहेत. अंजनेयनगर येथेच त्यांचे वास्तव्य आहे.
अंजनेयनगर येथील बंगल्यात डॉ. उमाकांत व मुलगा रवी हे दोघेच राहत होते. स्वयंपाकासाठी त्यांनी एक स्वयंपाकी ठेवला होता. बैलहोंगल येथे ते डॉक्टरी सेवा करत होते. रोज सकाळी यासाठी बैलहोंगल येथे जावून ते रात्री घरी परतायचे. 31 जानेवारी रोजी रात्री सांबरा येथे असलेल्या 10 गुंठे जमिनीवर कर्ज काढण्यावऊन डॉ. उमाकांत व रवी यांच्यात कडाक्मयाचे भांडण झाले होते.
भांडणानंतर डॉ. उमाकांत हे आपल्या मुलीच्या घरी गेले. घडला प्रकार आपल्या मुलीला सांगितला. त्यानंतर पुन्हा ते आपल्या घरी आले. दुसऱ्या दिवशी 1 जानेवारी 2018 रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास ते आपल्या घरी दाखल झाले. त्यावेळी मुलगा रवी घरातच होता. डॉ. उमाकांत यांनी बेल वाजविताच त्याने दरवाजा उघडला. डॉ. उमाकांत घरात प्रवेश करताच रवीने त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड टाकली. त्यानंतर पारीने डोक्मयावर हल्ला कऊन त्यांची हत्या केली होती. आता न्यायालयाने त्याला जन्मठेपची शिक्षा दिली आहे.
सरकारी वकील अॅड. चाटे यांचे मोठे प्रयत्न
बेळगाव मुख्य जिल्हासत्र न्यायालयामध्ये गेली अनेक वर्षे आर. एन. चाटे यांनी सरकारी वकील म्हणून सेवा बजावली होती. काही वर्षांपूर्वी ते निवृत्त झाले. निवृत्त होण्यापूर्वी त्यांनी शीतल चौगुले यांच्या खून प्रकरणातील आरोपींना शिक्षा ठोठावण्यासाठी त्यांनी मोठे प्रयत्न केले होते. त्यानंतर आता या खटल्यामध्ये विशेष सरकारी वकील म्हणून त्यांनी काम पाहिले. वडिलाचा खून करणाऱ्याला शिक्षा ही झालीच पाहिजे, समाजाला एक वेगळा संदेश दिला पाहिजे, यासाठी त्यांनी प्रयत्न केले आणि त्याला यशही आले.