पुनश्च रत्न अध्याय
बऱ्याच दिवसांपूर्वी ‘खजाना’तील एका लेखामध्ये रत्नांविषयी माहिती दिली होती. पुन्हा रत्नांबद्दल लेख लिहिण्याचे कारण म्हणजे अजूनही लोकांमध्ये रत्नांविषयी बरेच गैरसमज आहेत किंवा असे म्हणूया की गैरसमज मुद्दाम पसरवले गेलेले आहेत. यातील एक महत्त्वाचा गैरसमज म्हणजे राशी रत्न. राशी रत्न नावाचा प्रकार अस्तित्वात नसतो. राशी रत्न हा केवळ भ्रम आहे. राशीचे रत्न धारण केल्यामुळे नुकसान झालेल्याची अनेक उदाहरणे आहेत. मुळात बारा राशी असतात. बारा राशी नवग्रहांच्या अंमलाखाली येतात. रवी आणि चंद्र सोडल्यास प्रत्येक ग्रहाला दोन राशींचे स्वामित्व दिले गेलेले आहे. राहू आणि केतू यांना स्वत:ची रास नाही. मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी पोवळे धारण करावे, वृषभ आणि तोयेच्या लोकांनी हिरा घालावा, मिथुन आणि कन्येच्या लोकांनी पाचू घालावा, धनु आणि मीनेच्या लोकांनी पुष्कराज घालावा, मकर, कुंभेच्या लोकांनी नीलम घालावा याच्यासारखा मूर्खपणा नाही. रत्न धारण करायला सांगण्याच्या मुख्यत: दोन पद्धती आहेत. जे ग्रह तुमच्या कुंडलीप्रमाणे शुभ फळ देणारे आहेत (मग मुळात ते पापग्रह का असेनात) पण त्यांच्या डिग्रीमुळे किंवा असे म्हणूया की अवस्थेमुळे शुभ फळ देण्याच्या अवस्थेमध्ये-कंडिशनमध्ये ते नाहीत, मग त्यांची ताकद वाढविण्याकरता त्या ग्रहाचे रत्न वापरले जाते. दुसरी पद्धत अशी आहे की, राशींच्या डिग्री, त्या राशी कुठल्या भावात पडल्या आहेत, याचा अभ्यास आणि त्या राशींचा स्वामी किती ताकदीने शुभ फळ देऊ शकतो, याचे तर्कशुद्ध अनुमान या आधारे रत्न धारण करण्यास सांगितले जाऊ शकते. माझ्यामते दुसरी पद्धत ही जास्त शास्त्रीय आणि अनुभव देणारी आहे. नावावरून रत्न सांगणे, जन्मतारखेवरून रत्न घालण्यास सांगणे म्हणजे ‘अंदाजपंचे धागोदरसे’ करण्यासारखे आहे. माणिक, मोती, पोवळे, पाचू, पुष्कराज, हिरा, नीलम, गोमेद आणि लसण्या या नवरत्नांशिवाय जवळ जवळ 300 हून जास्त रत्नांचे प्रकार अस्तित्वात आहेत. गरज आहे, ती रत्नशास्त्राचा सखोल अभ्यास करण्याची. कुंडली आणि नवग्रहांच्या अतिरिक्त जातकाच्या समस्येप्रमाणेसुद्धा रत्नांचा वापर केला जाऊ शकतो. मानसिक शांततेकरिता, शारीरिक व्याधीकरिता, पती-पत्नीमध्ये संबंध मधुर रहावे याकरिता अशा अनेक प्रकारच्या समस्यांकरिता वेगवेगळ्या प्रकारची रत्ने, क्रिस्टल्स वापरता येऊ शकतात. मुळात तुमच्या कुंडलीमध्ये जे नवग्रह आहेत त्यापैकी काही ग्रह तुम्हाला शुभ परिणाम देतात, म्हणजे चांगल्या घटना घडवतात, म्हणजे ते तुमचे हिरो आहेत आणि त्याचप्रमाणे काही ग्रह तुम्हाला अशुभ परिणाम देतात, वाईट फल देतात म्हणजे ते तुमचे व्हिलन आहेत. काही लोक नवग्रहाच्या अंगठ्या घालतात. म्हणजे तुमच्या आयुष्यातील हिरो आणि व्हिलन दोघांनाही तुम्ही धारण करता, हे हास्यास्पद नाही का?
पेरीडॉट, पायराईट, अवेंचुरिन, हर्माईट, ऑनेक्स, चंद्रकांत मणी (स्ददह stदहा), ]िफरोझा, रेड सन स्टोन, ब्लड स्टोन अशा अनेक रत्नांचा उपयोग करून आयुष्य सुसह्य केले जाऊ शकते, चांगले परिणाम मिळवता येऊ शकतात. पण गरज आहे योग्य अभ्यासाची.
पती-पत्नीमध्ये प्रेम स्थापित करण्यासाठी: पतीकडून प्रेमाची अपेक्षा असल्यास पत्नीने श्रीकृष्णाचे स्मरण करत शुक्रवारी तीन वेलच्या आपल्या शरीराला स्पर्श करून पदराला किंवा ऊमालाला बांधून स्वत:जवळ ठेवाव्यात. शनिवारी ह्या एखाद्या पदार्थात घालून नवऱ्याला खाऊ घालाव्या, असे तीन शुक्रवार केल्याने लाभ मिळेल.
सोपी वास्तू टिप: पती-पत्नींनी वापरलेली चादर घडी करून परत अंथऊणात न ठेवता, कपाटात ठेवावी.
मेष
आरोग्य आणि धनप्राप्ती या दोन्हीसंबंधी चिंता करण्याची आवश्यकता नाही. अपेक्षा नसताना एखादी व्यक्ती आर्थिक मदत करू शकते. कुटुंबात ज्येष्ठांचा सल्ला ऐकल्याने अडलेली कामे पूर्ण होतील. कागदोपत्री सही करत असताना सावध रहा. कागदपत्रे जमा करण्याचेवेळी ती पूर्ण आहेत का हे तपासणे आवश्यक ठरेल.
उपाय- सूर्य दर्शन घेऊन कामे करावीत.
वृषभ
कुटुंबातील व्यक्तींची साथ लाभेल. त्यातही भावंडांची साथ महत्त्वाची ठरेल. स्थावर मालमत्तेच्यासंबंधी काही निर्णय घेण्यास सध्याला अनुकूल काळ नाही. वैवाहिक जीवनामध्ये आनंद प्राप्त होईल. देवदर्शनाकरिता लांबचा प्रवास करण्याचा विचार कराल. मित्राच्या मदतीने काही कामे पूर्ण होण्याची शक्मयता आहे.
उपाय- पांढऱ्या गाईची सेवा करावी.
मिथुन
मन थोडे अस्थिर राहण्याची शक्मयता आहे. तब्येतीच्या तक्रारींकडे दुर्लक्ष कज्ञ् नका. वाहन खरेदी किंवा स्थावर मालमत्तेच्या व्यवहारामध्ये चांगले यश मिळेल. नोकरदार वर्गाच्या कामाचे कौतुक होईल. पाळीव प्राणी घेण्याचा विचार करत असाल तर अनुकूल काळ आहे. सोबत काम करणाऱ्यांचे मत जाणून घेण्याचा प्रयत्न करा. उपाय-अन्नदान करावे.
कर्क
प्रवास सध्या टाळलेला बरा. प्रॉपर्टीच्यादृष्टीने उत्तम काळ आहे. प्रेमप्रसंगात वादाची शक्मयता आहे. शेअर बाजारापासून दूर राहणे शहाणपणाचे ठरेल. नोकरीमध्ये वरिष्ठांचा त्रास जाणवू शकतो. वैवाहिक जोडीदाराने मनासारखे न वागल्यामुळे मन उदास होऊ शकते.
उपाय- गुरुवारी दुपारी 11.45 वाजता केळीच्या झाडाची पूजा करावी.
सिंह
आईसंबंधी काळजी वाटू शकते. प्रॉपर्टीच्या व्यवहारात सावध राहणे गरजेचे आहे. तुमच्यात असलेल्या कलागुणांना सध्या वाव न मिळाल्याने मन उदास होईल. नोकरदार वर्गाला उत्तम काळ आहे. वैवाहिक जोडीदाराशी महत्त्वाच्या गोष्टींबद्दल चर्चा कराल. सहकारी मदत करतील. अति विश्वास करू नका.
उपाय- कष्टकरी मजुरांना दूध दान द्या.
कन्या
आरोग्याच्या तक्रारीकडे दुर्लक्ष केल्यानंतर त्रास होऊ शकतो. एखाद्या तिऱ्हाईत व्यक्तीमुळे कुटुंबात वाद होऊ शकतो. प्रवासात त्रास होऊ शकतो. प्रेमसंबंधांमध्ये यश मिळेल. विवाहोत्सुक लोकांना चांगली स्थळे प्राप्त होऊ शकतात. नोकरीमध्ये वरिष्ठांचे सहकार्य मिळाल्याने अवघड कामे पूर्ण होतील. वैवाहिक जोडीदाराची साथ मिळेल.
उपाय- दत्त दर्शन घ्यावे
तूळ
प्रॉपर्टीच्या दृष्टीने किंवा स्थावर मालमत्तेच्या दृष्टीने येणारा काळ महत्त्वाचा ठरणार आहे. यासंबंधी कोणतेही निर्णय घेताना चार चौघांना विचारून घ्या. आरोग्याविषयी जागरूक राहण्याची गरज आहे. काही वाईट सवयी सोडायचा आत्ता प्रयत्न केला तर यशस्वी व्हाल. मनातील योजना इतरांशी शेअर करताना सावध रहा.
उपाय – तांबडे वस्त्र दान द्यावे
वृश्चिक
खाणेपिणे नीट सांभाळल्यास तब्येतीची तक्रार येणार नाही, पण थोडा त्रास संभवतो. तुमच्या बोलण्यामुळे कुणाचे मन दुखावले जाऊ नये, याची दक्षता घ्या. पुढे जाऊन याचा त्रास होऊ शकतो. भावंडांचे सहकार्य प्राप्त होईल. अडचणीच्या प्रसंगी शेजारी मदतीला येतील. प्रेमसंबंधात दगाफटका होण्याची शक्मयता आहे.
उपाय- पिवळे वस्त्र दान द्यावे.
धनु
कागदोपत्री व्यवहारांमध्ये यश मिळण्याची शक्मयता आहे. जमिनीच्याबाबतीत काही निर्णय सध्या टाळावेत. प्रेमसंबंधात सुधार होईल, मधुरता येईल. छोट्या आर्थिक गुंतवणुकीतून फायदा होण्याची शक्मयता आहे. समाजामध्ये मान-सन्मानामध्ये वाढ होईल. घरातील जेष्ठ व्यक्तीबद्दल काळजी वाटण्याची शक्मयता आहे.
उपाय- लाल गायीची सेवा करावी.
मकर
तब्येतीच्या छोट्यामोठ्या तक्रारी दूर होतील. पण हवामान बदलाचा परिणाम होऊन छोटेमोठे आजार त्रास देऊ शकतात. या काळात आत्मविश्वासामध्ये वाढ होईल. कामात यश मिळेल. कोणालाही उधारी देण्याच्या भानगडीत पडू नका. घरातील वाद-विवाद बाहेर जाऊ नयेत याची काळजी घ्यावी.
उपाय- देवीला कुंकुमार्चन करावे.
कुंभ
तुमची प्रकृती नाजूक नाही हे ध्यानात घेण्याची वेळ आहे, घाबरणे सोडावे. आत्मविश्वासपूर्वक कामे केल्यास ती पूर्ण होतील. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे कुटुंबातील व्यक्तींची साथ लाभेल. त्यातही भावंडांची साथ महत्त्वाची ठरेल. स्थावर मालमत्तेसंबंधी काही निर्णय घेण्यास सध्या अनुकूल काळ नाही.
उपाय- हळकुंड दान द्यावे.
मीन
कागदोपत्री व्यवहार पूर्ण करण्याकरता किंवा कामानिमित्त प्रेझेंटेशन करण्याकरता हा काळ उत्तम आहे. चांगल्याप्रकारे यश प्राप्त होईल. प्रॉपर्टीसंबंधी अडलेली कामे पूर्ण करण्याचा प्रयत्न केल्यास त्यामध्ये यश मिळेल. आर्थिक आवक जेमतेम राहील. कुटुंबात वाद होऊ नये यासाठी विशेष प्रयत्न करावे लागतील.
उपाय- काळे वस्त्र दान करावे