राधानगरी/महेश तिरवडे
राधानगरी धरणाच्या मध्यभागी असलेला बेनझीर व्हीला हा धरणातील पाणी साठा कमी झाल्याने सुमारे 6 वर्षानंतर आज सायंकाळी खुला झाला आहे,सध्या राधानगरी धरणातील पाणी साठा 1.65 टक्के असल्याने ही वास्तू खुली झाली आहे
कोल्हापूर जिल्हा सुजलाम सुफलाम व्हावा म्हणून पिण्याच्या पाण्याची सोय व सिंचनासाठी छ, शाहू महाराजांनी 1908 साली राधानगरी धरण उभारणीचे काम सुरू केले,छ, शाहू महाराजांनी धरणाच्या पाहणी व देखरेखीसाठी धरणाच्या मध्यभागी हा बेनझीर व्हीला उभारण्यात आला होता,
गेल्या अनेक वर्षे राधानगरी धरणाची पाणी पातळी कमी झाली नव्हती, मात्र यावर्षी अवकाळी व वळीव सदृश पावसाने दडी मारल्याने ,पाण्याची वाढती मागणी लक्षात घेऊन व मृग नक्षत्र पावसाने ओढ दिल्याने सन 2016 व 2017 या साली सलग दोन वर्षे मे महिन्याच्या अखेरीस ही वास्तू खुली होत असे, मात्र धरण पाणलोट क्षेत्रात या वर्षी जून महिना संपत आला तरी पाऊस पडला नाही, म्हणून ही वास्तू पहिल्यांदा जून महिन्यात खुली झाली, अनेक वेळा ही वास्तू मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात खुली व्हायची या वर्षी जून महिन्यात पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी खुली झाली आहे
या वास्तूकडे जाताना राधानगरी, हत्तीमहाल,पडळी, राऊतवाडी धबधबा या मार्गे राऊतवाडी(जुने करंजे) या गावात जाऊन तेथून 2 ते 3 की मी पायी चालत जाऊन ही वास्तू पहावयास मिळते, सध्या ही वास्तू खुली झाली असली तरी धरणातील पाण्यात ओलावा असल्याने साधारणपणे 50 मीटर अंतरा पासून चिखल तुडवत जावे लागत आहे, याठिकाणी ही वास्तू आता काट्याकुट्यानी व झाडाझुडुपांमध्ये व्यापली असून पर्यटकांनी हया वास्तुकडे जाताना वाटेत विशेष काळजी घेणे गरजेचे आहे तसेच शाहूकालीन ऐहितासिक वास्तुचे जतन करणे आवश्यक आहे