प्रतिनिधी,रत्नागिरी
Ratnagiri News : शहरातील मिरकरवाडा येथे 16 वर्षीय मुलाचा विहीरीत बुडून मृत्यू झाला. ही घटना शनिवारी दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास घडली. महमद युनुस चाँद साली (वय- 16, रा. विजापूर सध्या शेट्येनगर रत्नागिरी) असे मृताचे नाव आहे. या घटनेची नोंद रत्नागिरी शहर पोलिसांत करण्यात आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महमद साली हा शेट्येनगर येथे आपल्या कुटुंबासोबत वास्तव्य करत होता. शनिवारी दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास त्याने आपण मिरकरवाडा येथे खेळण्यासाठी जात असल्याचे आईला सांगितले. दरम्यान, दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास महमद साली हा बेशुद्ध अवस्थेत मिरकरवाडा येथील विहीरीमध्ये आढळून आला. त्याला उपचारासाठी जिल्हा शासकीय रूग्णालय येथे दाखल करण्यात आले. यावेळी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी महमद याला तपासून मृत घोषीत केले.
या घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांकडून घटनास्थळी दाखल होत पंचनामा करण्यात आला. तसेच शहर पोलिसांत अकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून त्यानुसार पुढील तपास करण्यात येत आहे अशी माहिती पोलिसांनी दिली.