राधानगरी, प्रतिनिधी
Rautwadi waterfall News : गेल्या आठवड्यापासून पाण्याचा प्रवाह वाढल्याने राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधबा पर्यटनासाठी बंद करण्यात आला होता. तहसीलदार आणि पोलीस प्रशासनाने पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी हा निर्णय घेतला होता. पावसाचा जोर कमी झाल्याने रविवार दि. ३० जुलै पासून पर्यटकांना राऊतवाडी धबधब्याचा पुन्हा आनंद घेता येणार आहे.
राधानगरी तालुक्यातील राऊतवाडी धबधब्याकडे राज्यासह कर्नाटक,कोकण,गोवा भागातुन पर्यटक येत असतात.गेली आठवडाभर पावसाची संततधार होती पाण्याचा प्रवाह वाढला होता.या प्रवाहातुन लहान,मोठे दगड येत असल्याने आणि प्रवाह वाढल्याने राधानगरी तहसिल आणि राधानगरी पोलीसांनी गांभीर्य ओळखुन अनिश्चित काळासाठी धबधब्याकडे येणाऱ्या पर्यटकांना बंदी घातली होती.
धबधब्याकडे येणारे मार्ग पोलीसांनी बंद केले होते.पावसाचा जोर कमी झाल्याने रविवारी ३० जुलै पासून पुन्हा पर्यटकांना धबधब्याचा आनंद घेता येणार आहे. पर्यटकांनी नियमांचे पालन करत वर्षा पर्यटनाचा आनंद घेण्याचे आवाहन राधानगरीच्या तहसिलदार अनिता देशमुख आणि पोलीस निरीक्षक ईश्वर ओमासे यांनी केले आहे.