विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाल्यानंतर आज भाजपने विष्णू देव साई यांच्या नावासमोर शिक्कामोर्तब केले आहे. नुकतीच रायपूर येथील भाजपच्या प्रदेश कार्यालयात विधिमंडळ पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीत भाजपचे निरीक्षक अर्जुन मुंडा, सर्बानंद सोनोवाल आणि दुष्यंत गौतम यांनी नवनिर्वाचित आमदारांची चर्चा केली. यावेळी भाजपने त्यांच्या मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा केली आहे.
मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा आणि मिझोराम विधानसभा निवडणुकीत भाजपने तीन राज्यात बहुमत मिळाले. भाजपने राजस्थान, मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमध्ये बाजी मारली. छत्तीसगडनंतर लवकरच भाजप राजस्थान आणि मध्य प्रदेश येथील मुख्यमंत्र्याच्या नावाची घोषणा करेल.