पुन्हा एकदा मतदारनोंदणी मोहीम सुरू करण्यात
मुंबई / प्रतिनिधी
मुमानी मुंबई, 1 जानेवारी, प्रतिनिधिरू राज्यात नावे सरकार स्थापन झाले असून पुन्हा एकदा मतदारनोंदणी मोहीम सुरू करण्यात आली आहे. नवीन मतदारांची नोंदणी, मतदान पेंद्रांचे सुसूत्रीकरणे, प्रारुप मतदार यादी तयार कणे, दावेल्ल्हरकती, डेटाबस अद्ययावत करण्यात येत आहे.तसेच अंतिम टप्प्यात मतदार यादी प्रसिद्ध करण्याचे वेळापत्रक आखण्यात आले आहे. राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाने त्याबाबत राज्यातील सर्व विभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकार्यांना संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा दिला आहे. नवीन तरुण मतदारांची नोंदणी वाढल्याने पुढील निवडणुकांमध्ये मतदानटक्का वाढण्यास मदत होउ शकेल.
पेंद्रीय निवडणूक आयोगाने नव्या वर्षात यासंदर्भात आराखडा तयार केला आहे. त्याआधारे राज्यात त्याची अमलबजावणी केली जाणार आहे. त्यात प्रामुख्याने मतदाननोंदणी, डेटाबेस अद्ययावतीकरण आदी सर्व गोष्टींवर भर दिला जाणे अपेक्षित आहे. मतदार पडताळणी कार्यक्रम हाती घेतला जाताना त्यात मतदानपेंद्रांचे सूसुत्रीकरण, प्रमाणीकरणासारख्या गोष्टी हाताळल्या जात आहे. ही मोहीम नोव्हेंबरपासून सुरू झाली असून ती 13 फेब्रुवारीपर्यंत चालणार आहे.
राजकीय पक्षांप्रमाणेच मतदारांकडूनही मतदारयादीतील नावांबाबतचा गोंधळ कमी होण्यासाठी अचूक यादीचा आग्रह नेहमीच धरला जातो. त्यासाठी मतदारयादीची अचूकता पेंद्रस्थानी असल्याचे म्हणणे मांडले जाते. ती अपेक्षा पूर्ण करण्याची मागणी सातत्याने सर्वसामान्यांकडून केली जाते.
साधारणतरू नवीन मतदारांची नोंदणी मोठय़ासंख्येने होण्यासाठी नेहमी प्रयत्न केले जातात. त्याबरोबरीने नावांमध्ये झालेला बदल, नावातील चुकीची नोंद बदलणे, घराचा बदललेला पत्ता अशा अनेक गोष्टीही जोडल्या जातात. या सर्व गोष्टींची जोड दिल्यानंतर प्रारुप मतदारयादी प्रसिद्ध केली जाते. त्यानंतर प्रारुप मतदारयादी 28 फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केली जाईल. ही यादी प्रसिद्ध झाली की त्यावर दावे, हरकती सादर करण्याची संधी दिली जाते. त्यासाठी 27 मार्चपर्यंतची अंतिम तारीख देण्यात आली आहे. तसेच 7ल्ल्8 आणि 14ल्ल्15 मार्च रोजी विशेष मोहीम हाती घेतली जाईल.
या सगळ्यानंतर 15 एप्रिलपर्यंत दावेल्ल्हरकती निकालात काढले जातील. त्याचप्रमाणे हाती असलेल्या डेटाबेसचे अद्ययावतीकरण आणि पुरवणी याद्यांची छपाई करण्याचे काम 30 एप्रिलपूर्वी पूर्ण होईल, असेही जाहीर करण्यात आले आहे. ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाली की अंतिम मतदारयादी मंगळवार, 5 मे रोजी प्रसिद्ध केली जाईल. त्या यादीतून मतदारसंख्येतील नेमकी वाढ कळणे शक्य होणार आहे.