वृत्तसंस्था / नवी दिल्ली
भारत संचार निगम लिमिटेड कर्मचाऱयांचा व्हीआरएसची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कंपनी नवीन योजना ग्राहकांच्यासाठी सादर करणार आहे. यात प्रामुख्याने 4-जी सेवा दाखल केली जाणार आहे. यासाठी कंपनीने 78,300 कर्मचाऱयांना व्हीआरएससाठी निवडले आहे. जे कंपनीच्या 14,500 कोटी रुपये स्टाफ कॉस्टमध्ये 50 टक्क्यांची हिस्सेदारी ठेवली जाते.
4-जी करीता गुंतवणूक
व्हीआरएस लागू करण्यात आल्यानंतर कंपनी वर्षाला 9 हजार कोटी रुपयांची बचत करणार आहे. यामुळे 4-जी सेवा सादर करणे कंपनीला सोपे होणार असल्याचा अंदाज मांडला आहे. या नवीन प्रकल्पाच्या उभारणीस कंपनी 12 हजार कोटी रुपये गुंतवणूक करणार आहे. ही गुंतवणूक बॉण्डच्या सहाय्याने करण्यात येणार आहे. 25 ऑक्टोबरमध्ये सरकारने बीएसएनएल आणि एमटीएनएलसाठी 69 हजार कोटी रुपयांचे पॅकेज देण्याची घोषणा केली होती.
ध्येयाचा संकल्प
कंपनी दोन वर्षात फायदा देणार असून आगामी पाच वर्षांत कंपनी कर रद्द करुन फायदा मिळवण्याची योजना आखणार आहे. यामध्ये कंपनी काही बँकांमधील ऍडव्हान्स पेमेन्ट करण्याची शक्यता असल्याचा विश्वास कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक पीके पुरवर यांनी व्यक्त केला आहे.