वृत्तसंस्था/ कटक
शेफाली वर्माच्या शानदार नाबाद अर्धशतकाच्या जोरावर शुक्रवारी येथे झालेल्या टी-20 चॅलेंजर करंडक महिलांच्या क्रिकेट स्पर्धेतील अंतिम सामन्यात इंडिया क संघाने इंडिया ब संघाचा आठ गडय़ांनी दणदणीत पराभव करून अजिंक्मयपद पटकाविले.
या सामन्यात प्रथम फलंदाजी करताना इंडिया ब संघाने 20 षटकात 6 बाद 131 धावा जमविल्या होत्या. इंडिया ब संघातील पूजा वस्त्रsकरने 3 षटकार आणि 3 चौकारांसह 22 चेंडूत नाबाद 43 धावा झळकविल्या. इंडिया क संघाच्या मनाली दाक्षिणीने 15 धावांत 3 गडी बाद केले. प्रत्युत्तरादाखल खेळताना वेदा कृष्णमूर्तीच्या नेतृत्वाखाली इंडिया क संघाने 15.2 षटकात 2 बाद 135 धावा जमवित हा सामना आठ गडय़ांनी एकतर्फी जिंकला. हरियानाच्या पंधरा वषीय शेफाली वर्माने चौफेर फटकेबाजी करताना 2 षटकार आणि 15 चौकारांच्या मदतीने 48 चेंडूत नाबाद 89 धावांची खेळी केली. माधुरी मेहताने 20 चेंडूत 30 धावा जमविल्या.
संक्षिप्त धावफलक
इंडिया ब 20 षटकात 6 बाद 131 (पूजा वस्त्रकार नाबाद 43, मनाली दाक्षिणी 3-15, डी. हेमलता आणि राजेश्वरी गायकवाड प्रत्येकी 1 बळी), इंडिया क 15.2 षटकात 2 बाद 135 (शेफाली वर्मा नाबाद 89, माधुरी मेहता 30).