ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
जागतिक मंदीचा फटका यंदा रोजगार निर्मितीला बसणार आहे. अर्थव्यवस्थेतील मंदीमुळे चालू आर्थिक वर्षात 16 लाख रोजगारांच्या संधी कमी होणार असल्याचे एसबीआयच्या एका अहवालातून समोर आले आहे.
एसबीआयने नुकताच एक अहवाल सादर केला आहे. त्यानुसार, यंदा 16 लाख रोजगारांची उपलब्धता कमी होईल. त्याचा जास्त फटका हा उत्तरप्रदेश आणि बिहारसारख्या राज्यांना बसणार आहे. सन 2019-20 मध्ये विकासदर पाच टक्क्यांहून खाली येण्याची शक्यता आहे. त्यामुळे 15.8 टक्क्यांची नोकऱयांमध्ये कपात करण्यात आली आहे. आसाम, राजस्थान, यूपी, बिहार, मध्य प्रदेश, ओडिशा सारख्या राज्यांमधल्या कर्मचाऱयांच्या घरी पैसे पाठवण्याच्या संख्येत कपात आली आहे. तर केंद्र आणि राज्य सरकारही नवीन नोकरींमध्ये 39 हजारांची कपात करू शकते.