प्रतिनिधी/ सातारा
राज्य शासनाच्यावतीने प्रायोगिक तत्त्वावर सातारा शहरात चार ठिकाणी शिवभोजन योजना सुरू झाली असून एसटी स्टॅड, सिव्हिल हॉस्पिटल, राजवाडा, जिल्हा परिषद कॅन्टिनमध्ये दुसऱया दिवशी सोमवारी व मंगळवारी शिवभोजन थाळीसाठी रांगा लागल्या होत्या. यांचा आस्वाद घेण्यासाठी गरजु लोकांची संख्या कमी दिसत आहे. या शिवभोजन मिळणाऱया ठिकाणी फलक लावले नसल्याने याची माहिती अद्याप गरजु लोकांपर्यत पोहचलेली नाही.
26 जानेवारी पासून संपूर्ण महाराष्ट्रात शिवभोजन योजना सुरू झाली. साताऱयात चार ठिकाणी हे शिवभोजन मिळत आहेत. पहिल्या दिवशी या महत्त्वाकांक्षी योजनेस चांगला प्रतिसाद मिळत असून मंगळवारीही शिवभोजन स्थळी लोकांनी रांगा लावल्या होत्या. सकाळी 12 ते 2 या वेळेत शिवभोजन देण्यात येत आहे. अवघ्या दहा रूपयांत जेवण मिळत असल्याने नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे. दोन चपाती, भात, लोणचे आणि दोन भाज्या या थाळीत देण्यात येत आहेत. साताऱयात दररोज 500 थाळयाचे नियोजन करण्यात आले आहे. मंगळवारी एसटी स्टॅड कॅन्टिन मध्ये 125 थाळया, सिव्हिल हॉस्पिटल 102, मोतीचौक 100, जिल्हा परिषद कॅन्टिन 77 जणांनी थाळीचा आस्वाद घेतला. परंतु ही योजना गरीब, गरजु लोकांसाठी सूरू करण्यात आली आहे. उद्घाटनानंतर यांचा आस्वाद गरजु कमी अन् सर्वसामान्य लोक, महाविद्यालयीन विद्यार्थी, परगावचे लोक घेत आहेत. साताऱयात या शिवथाळीचे फलक लावले नाहीत. ज्या ठिकाणी ही थाळी मिळत आहे. तिथेही छोटे फलक लावण्यात आले आहेत. यामुळे गरजु लोंकाना यांची माहिती नाही. दोन तासामध्ये जे ग्राहक यांचा आस्वाद घेण्यासाठी येत आहेत. त्यांचे नाव, पत्ता, फोटो ही सर्व माहिती शिवभोजन ऍप मध्ये नोंदवली जात आहे. हे ऍप 12 ते 2 या वेळेत सुरू असते. दुपारी 2 नंतर ते बंद होत आहे. या ऍपमुळे पारदर्शकता आली आहे. मात्र यामुळे गरीब गरजु लोकांची गैरसोय होत असून शिवथाळी भोजनापासून ते वंचित राहत आहेत.