प्रतिनिधी / सैनिक टाकळी
गुरुदत्त शुगर्स लिमिटेड टाकळीवाडी तालुका शिरोळ येथील शेकडो परप्रांतीय कामगार स्वगृही परत पाठवण्याच्या मागणीसाठी गुरुदत्त कारखान्यावर मोठ्या संख्येने येत होते. येथील सुरक्षारक्षकांनी सदर कामगारांना येथील गेटवरच थांबवले त्यामुळे परप्रांतीय कामगारांनी एकच गोंधळ केला आम्हाला आमच्या गावी सोडा अशा हिंदीमध्ये घोषणा देण्यात आल्या यावेळी येथील वातावरण तंग झाले होते.
यावेळी सोशल डिस्टन्सचा फज्या उडाला होता. सदर कारखान्याचा गळीत हंगाम बंद होऊन दोन महिने उलटले आहेत आमची उपासमार होत आहे. आमच्या हाताला काम नाही आमचे इतर भागातील कामगार गावी गेले आहेत अजून आम्हाला का सोडली नाही आम्हाला लवकर सोडण्याची व्यवस्था करा गेले किती दिवस किती दिवस झाले आमचा कॉन्ट्रॅक्टदार आमच्यापर्यंत येत नाही आमच्या पोटाला काही देत नाही आमची उपासमार होत आहे. आम्हाला बसची नाहीतर रेल्वेची सोय करा अन्यथा आम्ही पायदल चालत जातो आम्हाला येथून सोडा अशी विनंती कारखान्याचे एचआर मॅनेजर महेश पाटील यांच्याकडे करत होते. पाटील यांनी या परप्रांतीय कामगारांना समजावून सांगितले आम्ही उत्तराखंड, उत्तर प्रदेश, बिहार, या राज्यातील याठिकाणी कामगार आहोत.
या राज्यातील कामगारांची यादी आपल्या राज्यातील जिल्हाधिकाऱ्यांना कळविले आहे. सदर कामगारांचा कोल्हापूर जिल्हाधिकाऱ्यांनी जाण्याचा परवाना दिलेला आहे. परंतु फक्त बिहार राज्यांनी या कामगारांना घेण्यासाठी परवानगी दिलेली आहे. त्यांना दोन दिवसात बसची किंवा रेल्वेचे सोय झाल्यानंतर त्यांना लगेच सोडण्यात येईल यूपी सरकारने अजूनही परवानगी दिलेली नाही त्यामुळे यूपी सरकारची परवानगी येऊपर्यंत तुम्हाला येतेस थांबावे लागेल तुम्हाला तोपर्यंत आम्ही सर्व प्रकारची मदत करू असे आश्वासन पाटील यांनी दिले त्यानंतर त्या कामगारांनी टाळ्या वाजवून स्वागत केले केले.