रत्नागिरी/प्रतिनिधी
जिल्हा प्रशासनाकडे झारखंडचे असणारे आणि आता लॉकडाऊनमध्ये अडकून पडलेल्या मजुरांनी आपल्या गावी सोडण्याची मागणी केली होती. त्यानूसार या मजुरांना कोकण रेल्वेने झारखंडला सोडण्याचा निर्णय जिल्हाधिकारी यांनी घेतला असून उद्या रात्री 8 वाजता रत्नागिरीतून ही ट्रेन 1440 मजुरांना घेऊन रवाना होणार आहे.
यासाठी रत्नागिरी एसटी विभागाकडे जबाबदारी असून जिल्ह्यातील मजुरांना एसटीने रेल्वे स्टेशनला सोडण्यात येणार आहे. यामध्ये खेड तालुका 300, चिपळूण 244, गुहागर 144, रत्नागिरी 508, लांजा 73, राजापूर 58, संगमेश्वर 97 अशा 1440 मजूर आहेत.