आतापर्यंत दीड लाख लोक जिल्हय़ात दाखल
25 हजार रेडझोन मधून दाखल
-पालकमंत्री सतेज पाटील यांची माहिती
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्हय़ात कोरोना पॅझिटीव्ह संख्या वाढत असली तरी प्रशासनाने योग्य खबरदारी घेतली आहे. जिल्हय़ाबाहेरुन येणारे आपलेच बांधव आहेत. त्यांना परवानगीने प्रवेश देण्यात येणार आहे. 26 मे पासून याची अमलबजावणी करण्यात येणार आहे. अशी माहिती पालकमंत्री सतेज पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. आतापर्यंत 1 लाख 57 हजार 849 जणांना जिल्हय़ात प्रवेश देण्यात आला आहे. 3 ते 20 मे दरम्यान जिल्हय़ात आलेल्या 40 हजार 15 पैकी 20 ते 25 हजार लोक रेड झोन मधील आहेत. त्यांच्याबाबतीत दक्षता घेतली आहे. असेही पालकमंत्र्यांनी सांगितले.
पालकमंत्री म्हणाले, सामुहीक प्रयत्नांमुळे कोरोनाचा फैलाव रोखण्यात प्रशासनाला यश आले आहे. क्वारंटाईनवर 1 कोटी 71 लाख खर्च करण्यात आला आहे. सध्या मुंबई, पुणे येथे असलेले अनेकजन जिल्हय़ात परत येण्यास इच्छूक आहेत. त्यांनी पूर्व परवानगी घेतल्यास त्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. त्यानी अगाऊ परवानगी घेतल्यास त्यांना क्वारंटाईन करणेहा अन्य सोयी सुविधा त्या त्या तालुक्यात करणे शक्य होणार आहे. यासाठी परवानगी आवश्यक आहे. गेली तीन महिन्यापासून जिल्हा प्रशासनाने 40 लाख जनतेला व्यवस्थीत हातळले आहे. यापुढेही कोणतीही अडचण येणार नाही. आता गावागावता मुंबई पुणे येथून येणाऱयांना गावपातळीवर बंदी केली जात आहे. मात्र ग्रामस्थानी तसे न करता त्यांना चांगली वागणूक द्यावी, ते आपलेच आहेत. या भावनेतून त्यांना सहकार्य करावे असे आवाहनही पालकमंत्र्यांनी केले आहे. येत्या दोन दिवसात सर्व स्वॅबचे अहवाल प्राप्त होणार असून 26 पासून जिल्हय़ात येणाऱयांचे स्बॅब घेणे, क्वारंटाईन करण्याचे नियोजन तयार असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले
मुंबईनंतर कोल्हापुरात अत्याधुनिक लॅब
कोरानामुळे मुंबईनंतर कोल्हापुरात अत्याधुनिक लॅब उभारण्यात आली आहे. असे सांगत पालकमंत्री सतेज पाटील म्हणाले, यापुढे कोणत्याही तपासणीसाठी जिल्हय़ाबाहेर जावे लागणार नाही. सर्व प्रकारच्या तपासण्या जिल्हय़ात होणार असल्याने तात्काळ अहवाल मिळणार असून पुढील प्रक्रिया राबवणे सुलभ झाले आहे.