ऑनलाईन टीम / श्रीनगर :
जम्मू काश्मीरमधील कुलगाम जिल्ह्यात आज भारतीय सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये जोरदार चकमक झाली. या चकमकीत भारतीय सैन्याकडून दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला.
मिळालेल्या माहितीनुसार, दक्षिण काश्मीर मधील वानपुरा परिसरात काही दहशतवादी लपले असल्याची माहिती सुरक्षा दलाला मिळाली होती. त्यानंतर हा परिसर घेरून, शोध मोहीम रबविण्यात आली. त्यावेळी दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात गोळीबार करण्यात आला. या गोळीबाराला भारतीय सैन्याकडून चौखदार उत्तर देण्यात आले.
या चकमकीत दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले. काश्मीर झोनच्या अधिकाराने ट्विटरवर दिलेल्या माहितीनुसार, या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले असून त्यांची ओळख पटवण्याचे आणि ते कोणत्या संघटनेशी निगडित आहेत, याचा शोध घेतला जात आहे.
दरम्यान, दहशतवाद्यांकडून मोठ्या प्रमाणात शास्त्र आणि दारुगोळा जप्त करण्यात आला आहे.