सध्याच्या केंद्र सरकारने 2015 पासून असंघटित क्षेत्रातील कामगारांचा विचार करून तीन सामाजिक सुरक्षा योजना कार्यान्वित केल्या होत्या. त्यातली प्रमुख म्हणजे अटल पेन्शन योजना.
भारतात पेन्शन ही सरकारी, निम्नसरकारी व सार्वजनिक उद्योगातील कर्मचारी यांची मक्तेदारी होती. खासगी उद्योगात नोकरी करणाऱयांसाठी पेन्शन नव्हती. विमा कंपन्यांच्या पेन्शन योजना आहेत. पण कमी रकमेत पेन्शन मिळणारी ही केंद्र सरकारची चांगली योजना आहे. ही योजना गरिबांना डोळय़ासमोर ठेवून आखलेली असली तरी कोणीही भारतीय मग तो मध्यमवर्गीय असो की श्रीमंत, या योजनेत सहभागी होऊ शकतो. या योजनेत सहभागी होण्यासाठी विशेषतः सार्वजनिक उद्योगातील बँकेत बचत खाते असावे, आधार क्रमांक हवा व ज्याला योजनेत सहभागी व्हायचे असेल त्याच्या नावावर मोबाईल हवा. तुम्ही आतापर्यंत कोणत्याही पेन्शन योजनेत सहभागी नसाल तर प्रीमियम कमी भराव्या लागणाऱया या केंद्र सरकारच्या योजनेत नक्की सहभागी व्हा. वयाची 60 वर्षे पूर्ण झाल्यावर पेन्शनधारकाला या योजनेतून दर महिन्याला रुपये एक हजार ते रुपये पाच हजार इतक्मया रकमेची पेन्शन मिळू शकते. 18 वर्षांपासून ते 40 वर्षांपर्यंतच्या व्यक्ती या योजनेत सहभागी होऊ शकतात. योजनेत सहभागी होणाऱयाने किमान 20 वर्षे गुंतवणूक करावी लागते. पेन्शनधारक प्रीमियमची रक्कम दर महिन्याला, त्रैमासिक किंवा 6 महिन्यातून एकदा अशा असलेल्या पर्यायातून, त्याला योग्य वाटेल तो पर्याय निवडून भरू शकतो. प्रीमियमची रक्कम खात्यातून ‘ऑटोडेबिट’ केली जाते. ‘प्रीमियम’ची रक्कम ‘फिक्स’ असो तेवढी रक्कम तुमच्या बचत खात्यात असावयास हवी. तुमच्या बचत खात्यातून प्रीमियमची निश्चित रक्कम तुम्ही ठरविलेल्या कालावधीनुसार ‘डेबिट’ करून तुमच्या पेन्शन खात्यात जमा केली जाते. तुम्हाला 60 वर्षांनंतर तुमच्या हातात दर महिन्याला किती रक्कम पडायला पाहिजे, त्यानुसार प्रीमियमची रक्कम ठरविली जाते. या योजनेत गुंतविलेली दीड लाख रुपयांपर्यंतची रक्कम, गुंतविलेल्या आर्थिक वषी, आयकर कायद्याच्या कलम 80-सी नुसार कर सवलतीस पात्र आहे. तुम्ही जर 18 व्या वषी योजनेत सामील झाला व तुम्हाला महिन्याला रुपये एक हजार पेन्शन हवी असेल तर यासाठी मासिक रुपये 42 इतकी प्रीमियमची रक्कम भरावी लागेल. जर पाच हजार रुपये पेन्शन हवी असेल तर महिन्याला रुपये 210 प्रीमियम भरावा लागेल. जेवढय़ा जास्त वयावर (18 वर्षांपासून 40 वर्षांपर्यंत) योजनेत सहभागी व्हाल तेवढा प्रीमियम जास्त भरावा लागणार. जर 40 व्या वषी या योजनेत सामील झालात तर महिना एक हजार रुपये पेन्शन मिळण्यासाठी मासिक 1454 रुपये ‘प्रीमियम’ भरावा लागेल. कमाल पेन्शन पाच हजार रुपयेच मिळते. हे खाते बँकेत जाऊन उघडता येते. तसेच ‘ऑनलाईन’ ही उघडता येते. हे खाते उघडण्यासाठी फॉर्म असून, तो बँकेतच भरून द्यावा लागतो किंवा ‘ऑनलाईन’ सबमिट करता येतो. ‘केवायसी’ कागदपत्रे म्हणून आधारची फोटो प्रत व मोबाईल नंतर द्यावा लागतो. तुमचा अर्ज मंजूर झाल्यावर तुम्हाला ‘एसएमएस’ येतो. स्टेट बँकेत ऑनलाईन खाते उघडता येते. यासाठी तुमचे स्टेट बँकेत खाते हवे. ते असल्यास ‘नेटबँकिंग’ ने तुम्ही खाते उघडू शकता. पहिल्यांदा स्टेट बँकेची ‘जाईंट लॉगइन’ करा मग ‘ई-सर्व्हिस’ लिंक ‘क्लिक’ करा. मग नवीन ‘विंडो ओपन’ होईल. यावर तुम्हाला ‘सोशल सिक्मयुरिटी स्कीम असा पर्याय दिसेल. त्यावर ‘क्लिक’ करा. यात तुम्हाला तीन पर्याय दिसतील ते पीएम जेजे, पीएम एसबीवाय आणि एपीवाय (अटल पेन्शन योजना). ‘एपीवाय’ वर क्लिक करा. त्यानंतर तुमचा पूर्ण तपशील भरा. (फिड करा). खात्याचा क्रमांक, तुमचे नाव, वय, पत्ता याची माहिती बिनचूक ‘फिड’ करा. तुम्हाला किती रक्कमेची पेन्शन हवी ते क्लिक करा. तुम्हाला तुमच्या वयानुसार किती प्रीमियम भरावा लागेल हा आकडा तुम्हाला स्क्रिनवर दिसेल अशा तऱहेने खाते उघडून झाल्यावर त्याची प्रिंट घ्या व तुमच्याकडे पुरावा म्हणून ठेवा. ही योजना रोज कसून, रोज खाणाऱयांसाठी खरोखरच चांगली आहे. कारण उतारवयात हात पाय थकल्यावर ना भविष्य निर्वाह निधीची रक्कम मिळणार ना ग्रॅज्युईटी मिळणार.
पेन्शनची रक्कम जी फक्त 1 ते 5 हजार रुपये ठरविली आहे ती सध्याच्या महागाईचा विचार करता निदान 20 हजार रुपयांपर्यंत हवी होती. 5 हजार रुपयात कोणाची मासिक गुजराण होऊ शकते काय? तसेच योजनेत सहभागी होण्याचे कमाल वय जे ठेवलेले आहे त्यातही बदल आवश्यक असून ते 55 करावयास हवे. हे बदल केल्यावर त्यानुसार प्रीमियम वाढवावा पण योजना खरोखरंच ‘ग्राहकप्रिय’ करावी. ग्राहकांनी ही योजना आपल्यासाठी आहे हे वाटायला हवे व तेच योजनेचे यश असेल.