ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
भारत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा मोबाईल उत्पादक देश आहे. मागील 5 वर्षात देशात 200 हून अधिक मोबाईल निर्मिती केंद्र सुरू झाल्याची माहिती कायदा आणि न्याय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी दिली.
देशात सन 2014 च्या तुलनेत मोबाईल निर्मिती करणार्या कारखान्यांमध्ये सन 2019 मध्ये 200 टक्के वाढ झाली. यातील आलेखानुसार, 2019-20 या आर्थिक वर्षात 3 कोटी 30 लाख मोबाईल्सची निर्मिती करण्यात आली. या मोबाईल हॅण्डसेट्सची एकूण किंमत सुमारे 3 कोटी डॉलर्स इतकी आहे.
सन 2014 मध्ये मोबाईल निर्मिती करणारे केवळ 2 युनिट भारतात होते. तेव्हा 60 मिलियन स्मार्टफोन तयार करण्यात आले होते. त्या फोनची किंमत 3 बिलियन डॉलर्स एवढी होती. दरम्यान, इलेक्ट्रॉनिक कंपन्यांना जगातील दुसर्या मोठ्या इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या निर्मिती केंद्राचा भाग होण्याची संधी उपलब्ध होत असल्याने, इलेक्ट्रॉनिक यंत्रणा प्रारूप आणि निर्मिती क्षेत्रातील एक मोठे केंद्र म्हणून भारताचा विचार त्यांनी करावा, असे इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने म्हटले आहे.