संगमेश्वर/ वार्ताहर
रत्नागिरी जिल्हात मोठया प्रमाणात जांभ्या दगडाच्या चिरेखाणी आहेत. मात्र या चिरेखाणींना बंदिस्त आवार नसल्याने त्या अधिकच धोकादायक बनल्या आहेत. पावसाळयात साचणाऱया पाण्यामुळे त्यापूर्ण पणे भरत असल्याने त्यांचा धोका अधिकच वाढत आहेत. निवळी, हातखंबा, संगमेश्वर तसेच देवरुख भागात मोठया प्रमाणात अशा चिरेखाणी असून त्या बंदिस्त करण्यात याव्यात अशी मागणी होत आहे.
रत्नागिरी जिल्हात बांधकामाची कामे करण्यासाठी चिरेखाणी मोठया चालविल्या जातात.उन्हाळयात दिवस रात्र या चिरेखाणीतून चिरे काढण्याचे काम केले जाते.तसेच महसुल विभागाकडून काही ठिकाणी चिरे काढण्यासाठी परवानगी दिली जाते. चिरे काढण्यासाठी मोठया प्रमाणात यंत्राचा उपयोग केला जातो.मात्र चिरे काढल्यानंतर या चिरेखाणी बंदिस्त केल्या जात नसल्याने त्याचा धोका अधिक वाढतो.रत्नागिरी जिल्हात उघडया चिरेखाणींमुळे अनेक दुघर्टना घडलेल्या आहेत. पंरतू चिरेखाणी बंदिस्त करण्यात आलेल्या नाहीत.पावसाळया दरम्याने चिरेखाणीमध्ये पाणी साचत असल्याने याचा धोका अधिकच वाढतो.
जिल्हातील या चिरेखाणी बंदिस्त तसेच धोका कमी करण्यासाठी उपाययोजना करण्यात यावीत अशी मागणी करण्यात येत आहे.तसेच चिरेखाणी ज्या ठिकाणी आहेत त्याठिकाणी मोठया प्रमाणात भुस्सखन वाढलेले आहेत.तसेच घरांना तडे जाणे,दरडी कोसळण्याचे प्रकार घडत आहेत.त्यामुळे चिरेखाणींना परवानगी देताना सर्व अटिंचे काठेकोर पालन होईल याप्रकारणे बंधने घालणे आवश्यक असल्याचे जागृत नागरिकांचे म्हणणे आहे.