वाळपई प्रतिनिधी
सत्तरी तालुक्मयातील जवळपास 44 कर्मचारी जलसंपदा खात्याच्या रोजंदारीवर काम करीत आहे. त्यामुळे फक्त नऊ हजारावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे कठीण बनले आहे. गेल्या सहा महिन्यापासून कर्मचाऱयांचा पगार थकलेला आहे. यामुळे कुटुंबाचे पालन पोषण कसे करावे अशाप्रकारचा सवाल करून सरकारने या कर्मचाऱयांना नुकत्याच स्थापन केलेल्या सोसायटीमध्ये समावेश करावा त्याचप्रमाणे थकलेला गेल्या सहा महिन्याचा पगार ताबडतोब द्यावा अन्यथा आमच्यासमोर आत्महत्येशिवाय दुसरा कोणताही पर्याय नसल्याचे निवेदन सत्तरी तालुक्मयातील जलस्त्राsत खात्याच्या वेगवेगळय़ा ठिकाणी उपसा योजनेवर काम करणाऱया कर्मचाऱयांनी आपली खंत व्यक्त केली आहे .
वाळपईत आयोजित करण्यात आलेल्या खास पत्रकार परिषदेत त्यांनी आपल्यासमोर निर्माण होत असलेल्या गंभीर स्वरूपाच्या समस्या संदर्भाचा पाढा वाचला .
याबाबतची माहिती अशी की सत्तरी तालुक्मयात जलस्त्राsत खात्याच्या माध्यमातून वेगवेगळय़ा ठिकाणी उपसा योजनेवर पंप ऑपरेटर म्हणून जवळपास 44 कर्मचारी 2003 सालापासून काम करीत आहेत. सुरुवातीच्या काळात या कर्मचाऱयांनी अवघ्या तीन हजारांच्या पगारावर नोकरी पत्करली होती. सध्या 9000 वेतन मिळत आहे. मात्र हे वेतन वेळोवेळी मिळत नसल्यामुळे कुटुंबासमोर हलाखीची परिस्थिती निर्माण होत असल्याचे कर्मचाऱयांनी यावी आपली खंत व्यक्त करताना स्पष्ट केले. यामुळे सरकारने याकर्मचाऱयांना ताबडतोब सोसायटीत समाविष्ट करावे व वेतनामध्ये वाढ करावी अशा प्रकारची मागणी या कर्मचाऱयांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
गेल्या 2003 पासून आपण याखात्याच्या उपसा योजनेवर काम करीत आहे. डिसेंबर ते मे महिन्याचा पगार अजून देण्यात आलेला नाही. यामुळे आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होणार अशा प्रकारचा प्रश्न अर्जुन रामा सालेलकर यांनी व्यक्त केलेला आहे. याखात्याच्या अधिकाऱयांशी अनेकवेळा संपर्क साधून सुद्धा हे वेतन मिळालेले नाही .यामुळे आपल्या कुटुंबासमवेत गंभीर स्वरूपाचे समस्या निर्माण झाल्याचे अर्जुन सालेलकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
गेल्या दहा वर्षापासून आपण या खात्यात रोजंदारीवर काम करीत आहे. हाताची बोटे चालत नसल्यामुळे इतर ठिकाणी काम करणे आपल्याला जमत नाही .सहा महिन्यापासून केलेल्या कामाचा पगार अजूनही मिळालेले नाही. जानेवारीपासून पगार न मिळाल्यामुळे कुटुंबामोर अत्यंत हलाखीची परिस्थिती निर्माण झालेली आहे. का एकाबाजूने कोरोना रोगाची महामारी व दुसऱया बाजूने पगार न मिळाल्यामुळे कुटुंबासमोर आर्थिक दृष्टय़ा गंभीर स्वरुपाची समस्या निर्माण झालेली आहे.
सरकारने या कामगारांना कायमस्वरूपी करण्याचे दिलेले आश्वासन पाळण्याची मागणी वसंत परवार यांनी केली आहे. टाळेबंदीच्या काळात कामगारांनी वेगवेगळय़ा प्रकारची कामे केली मात्र अजून पर्यंत वेतन मिळालेले नाही. यासंदर्भात स्थानिक आमदारांची भेट घेतली तरीसुद्धा यासंदर्भात कोणत्या प्रकारची हालचाल झालेली नाही. सध्या आमच्याकडे अजिबात पैसे नाही त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा अशा प्रकारचा सवाल त्यांनी केलेला आहे .सध्या प्रतिमहिना नऊ हजार रुपयांचे वेतन मिळत आहे. मात्र ते वेळेवर मिळणे अत्यंत गरजेचे आहे. यामुळे सरकारने आम्हाला सोसायटीत सामील करून घ्यावे व थकलेले वेतन त्वरित द्यावे अशा प्रकारची मागणी त्यांनी केली.